शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नांदेडचे महापौर, उपमहापौर होणार आज पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:37 IST

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले

ठळक मुद्देमहापालिका : पाणीटंचाईच्या विशेष सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश

नांदेड : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले असून बुधवारी होणाऱ्या पाणीटंचाई संदर्भातील विशेष बैठकीत महापौर शीलाताई भवरे आणि उपमहापौर विनय गिरडे हे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत.नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे आणि उपमहापौरपदी विनय गिरडे यांची १ नोव्हेंबर २०१७ रोजी बहुमताने निवड झाली होती. महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ८१ पैकी ७४ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. महापौरपदाचा कालावधी हा संवैधानिकदृष्ट्या अडीच वर्षांचा असला तरीही काँग्रेसने नांदेडमध्ये महापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षाचा निश्चित केला होता. त्यानंतर दुसऱ्यांना संधी देण्याचे धोरण त्यामागे होते. त्यानुसार महापौर शीला भवरे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ उलटला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास दोन महिने जादा कार्यकाळ भवरे यांना उपभोगता आला आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर महापौर बदलाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र, आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेता हा बदल पुढे ढकलला. महापालिकेची विशेष सभा २२ मे रोजी बोलावण्यात आली आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौरांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिका-यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे.अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी नांदेड महापालिकेचे महापौरपद राखीव आहे. उर्वरीत १३ महिन्यांच्या कालावधीसाठी काँग्रेसच्या ज्योती सुभाष रायबोले, दिशा कपिल धबाले, ज्योती कदम, पूजा पवळे या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. पण त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कोणत्या प्रभागातून जादा मतदान होईल त्याच मतदानाच्या आधारावर नवा महापौर निवडला जाईल, असेही सांगितले जात आहे.नांदेड महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच अनुसूचित जाती प्रवर्गातून महिलेला मान मिळाला होता. काँग्रेसने शीला भवरे यांची निवड केली होती. तर उपमहापौरपदाचा मान विनय गिरडे यांना दिला होता.दरम्यान, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे बी. आर. कदम यांचाही काँग्रेसने ७ मे रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा घेतला आहे. पक्षातील सर्वांना न्याय मिळावा या हेतूने काँग्रेसने पदाधिकाºयांचा कालावधी निश्चित केला आहे. त्या धोरणानुसारच राजीनामे घेतले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निकालानंतर जवळपास १५ ते २० दिवसांत नव्या महापौर-उपमहापौरांची निवड होईल, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.पाणीटंचाईवर होणार चर्चाशहरात विशेषत: दक्षिण नांदेडात झालेल्या पाणीटंचाईवर चर्चा केली जाणार आहे. पाणीटंचाई निवारणासाठी होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील अनेक भागात वेळी-अवेळी होणारा पाणीपुरवठा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याचवेळी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र अनेक भागात आहे.पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती सदस्य उपस्थित करतील. विष्णूपुरीतील पाणी संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था काय? हा प्रश्नही कळीचा ठरणार आहे. जून अखेरपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन काय? टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था आदीबाबत चर्चा अपेक्षित आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाMayorमहापौरResignationराजीनामा