शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील १३ सिंचन योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:53 IST

गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे.

ठळक मुद्देअपुरे पर्जन्यमान : वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्यात झपाट्याने घट; जिल्ह्यात ३७ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे.जिल्ह्यात २०१६ मध्ये सरासरीच्या तुलनेत ११३ टक्के पाऊस झाला होता. २०१७ मध्ये मात्र त्यात घट होऊन केवळ ६७ टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील विष्णूपुरी वगळता अन्य मोठे प्रकल्प भरले नव्हते. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात जवळपास १३ दलघमी तर कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पात १३.५४० जलसाठा आहे. हा जलसाठा केवळ ९ टक्के उरला आहे. मध्यम प्रकल्पात कंधार तालुक्यातील महालिंगी प्रकल्प कोरडाठाक आहे तर मुखेड तालुक्यातील कुंद्राळा प्रकल्पात केवळ ३.६९६ टक्के जलसाठा उरला आहे. पेठवडज प्रकल्पात १० टक्के, किनवट तालुक्यातील लोणी प्रकल्पात ११ टक्के, लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पात ३१ टक्के, किनवट तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्पात ४१ टक्के, उमरी तालुक्यातील कुदळा मध्यम प्रकल्पात ४४ टक्के आणि देगलूर तालुक्यातील करडखेड मध्यम प्रकल्पात ६१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना चालविणे हे आगामी काळात जिकिरीचे ठरणार आहे. जिल्ह्यात आजघडीला ३६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून मुखेड तालुक्यात सर्वाधिक १६ गावांत आणि त्या खालोखाल नांदेड तालुक्यात १० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माहूरमध्ये ३, हदगाव, किनवटमध्ये २ तर भोकर, हिमायतनगर, कंधार, किनवटमध्ये प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ हदगाव, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी तालुक्यांत सिंचनासाठी वरदान ठरलेला इसापूर प्रकल्प यंदा मात्र तळाला गेला आहे. १२७९ दलघमी साठा क्षमता असलेल्या प्रकल्पात आजघडीला केवळ ९.९१० दलघमी जलसाठा शिल्लक राहिला आहे़सात हजार हेक्टर सिंंचनावर परिणामजिल्ह्यात गोदावरी नदीवर कार्यान्वित असलेल्या १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. गोदावरी नदीवर १९७५ ते १९८३ या कालावधीत १३ उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित होत्या. मात्र पुढील कालावधीत त्या बंद पडल्या. जवळपास ७४ दलघमी पाणी या सिंचन योजनासाठी वापरात येत होते. त्या त्या भागातील शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा लाभ होत होता. मात्र पावसाची अनियमितता यामुळे या जलसिंचन योजना सुरू ठेवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजघडीला बाभळी बंधाºयातून सोडण्यात येणाºया पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना या बंद उपसा जलसिंचन योजनाकडे मात्र दुर्लक्षच होत आहे. त्याच वेळी या योजना प्रत्यक्ष व्यवहार्य नसल्याची बाब पुढे आली आहे.या १३ उपसा जलसिंचन योजना नव्याने कार्यान्वित करण्यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. हा खर्च केल्यानंतरही प्रत्यक्ष होणारे सिंचन ही बाब तुलनात्मकदृष्ट्या नुकसानकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, बाभळी बंधारा कृती समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेतली़ बंधाºयातून सोडण्यात येणाºया पाण्याच्या वेळेबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.बंधाºयातून पाणी सोडण्यात आल्याने आजघडीला हा बंधारा कोरडा पडला आहे. यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत या बैठकीत चर्चा केली़ उपसा सिंचन योजनेमुळे ७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते़ सचिव प्रा़डॉ़बालाजी कोम्पलवार, अध्यक्ष नागोराव जाधव रोशनगावकर, उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, उपअभियंता प्रशांत पाटील करखेलीकर आदींची उपस्थिती होती़एकात्मिक जलआराखडा मंजूर : राज्याचा एकात्मिक जलआराखडा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात तब्बल ५०२ दलघमी पाणी मध्य गोदावरीसाठी मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध होणाºया या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजन न झाल्यास हे पाणीही तेलंगणात जाणार आहे. गोदावरी नदीवर असलेल्या १२ बंधाºयांच्या साखळीशिवाय अन्य बंधाºयांची उभारणी गोदावरी नदीवर करावी लागणार आहे. परभणी जिल्ह्यातील मुळी प्रकल्पापासून खालील बाजूस पाणी अडवावे लागणार आहे. त्यामुळे आता या मंजूर झालेल्या एकात्मिक जलआराखड्यातून प्राप्त होणाºया ५०२ दलघमी पाण्याचे नियोजन योग्यरित्या मध्य गोदावरीसाठी करावे लागणार आहे.

टॅग्स :godavariगोदावरीTemperatureतापमान