शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:02 IST

अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा निर्णय: आर्थिक उलाढाल मंदावल्याने कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अलीकडील काही महिन्यांत काहीशी सुधारली असली तरी मागील अनेक वर्षांपासून बँकेची स्थिती नाजूक आहे. त्यामुळेच २९ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन संचालक मंडळाने कमी उलाढालीसह तोट्यात असणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या शाखा बंद करण्याची कार्यवाही झाली नव्हती. साधारणत: वर्षभराने जिल्हा बँकेने त्यातील ९ शाखा बंद केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये शेवाळा आणि बारड या २ शाखांचे नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर ५ शाखा बाबतचा विषय ऐरणीवर होता. मात्र या शाखा बंद केल्यास शेतक-यांना त्रास होईल, जिल्हा बँकेच्या या शाखांमधूनच शासनाच्या विविध योजनांचा निधी दिला जात असल्यानेही शाखा बंद करु नये, अशी संचालक मंडळाची भूमिका होती. मात्र बँकेच्या आर्थिक उलाढालीत दिवसेंदिवस घट होत गेल्याने तोटाही वाढत गेला. पर्यायाने या शाखांची स्थिती सुधारत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ८ जून रोजी जिल्ह्यातील मांजरम, कलंबर, बारुळ, उस्माननगर आणि गणेशनगर (नांदेड) या ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर शाखा बंद केल्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा अग्रणी बँकेला पाठविण्यात आले असून रिझर्व्ह बँकेलाही याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान, बँकेने मोठ्या संस्थांकडील वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.---शेजारच्या शाखेतून होणार व्यवहारजिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने तोट्यात चालणाºया ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या भागातील सभासदांच्या सोयीसाठी या शाखा परिसरातील सभासदांना नजीकच्या शाखेशी जोडून देण्यात आले आहे. कलंबर शाखेतील सभासद सोनखेडशी, बारुळ शाखेचे चिखलीशी, उस्माननगर शाखेचे शिराढोणशी, मांजरम शाखेचे नायगावशी तर गणेशनगर येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे जिल्हा बँकेच्या नांदेड येथील जिल्हा परिषद शाखेतून व्यवहार होतील, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रBank of Indiaबँक ऑफ इंडिया