शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:02 IST

अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा निर्णय: आर्थिक उलाढाल मंदावल्याने कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अलीकडील काही महिन्यांत काहीशी सुधारली असली तरी मागील अनेक वर्षांपासून बँकेची स्थिती नाजूक आहे. त्यामुळेच २९ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन संचालक मंडळाने कमी उलाढालीसह तोट्यात असणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या शाखा बंद करण्याची कार्यवाही झाली नव्हती. साधारणत: वर्षभराने जिल्हा बँकेने त्यातील ९ शाखा बंद केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये शेवाळा आणि बारड या २ शाखांचे नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर ५ शाखा बाबतचा विषय ऐरणीवर होता. मात्र या शाखा बंद केल्यास शेतक-यांना त्रास होईल, जिल्हा बँकेच्या या शाखांमधूनच शासनाच्या विविध योजनांचा निधी दिला जात असल्यानेही शाखा बंद करु नये, अशी संचालक मंडळाची भूमिका होती. मात्र बँकेच्या आर्थिक उलाढालीत दिवसेंदिवस घट होत गेल्याने तोटाही वाढत गेला. पर्यायाने या शाखांची स्थिती सुधारत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ८ जून रोजी जिल्ह्यातील मांजरम, कलंबर, बारुळ, उस्माननगर आणि गणेशनगर (नांदेड) या ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर शाखा बंद केल्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा अग्रणी बँकेला पाठविण्यात आले असून रिझर्व्ह बँकेलाही याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान, बँकेने मोठ्या संस्थांकडील वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.---शेजारच्या शाखेतून होणार व्यवहारजिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने तोट्यात चालणाºया ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या भागातील सभासदांच्या सोयीसाठी या शाखा परिसरातील सभासदांना नजीकच्या शाखेशी जोडून देण्यात आले आहे. कलंबर शाखेतील सभासद सोनखेडशी, बारुळ शाखेचे चिखलीशी, उस्माननगर शाखेचे शिराढोणशी, मांजरम शाखेचे नायगावशी तर गणेशनगर येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे जिल्हा बँकेच्या नांदेड येथील जिल्हा परिषद शाखेतून व्यवहार होतील, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रBank of Indiaबँक ऑफ इंडिया