शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:02 IST

अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा निर्णय: आर्थिक उलाढाल मंदावल्याने कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अलीकडील काही महिन्यांत काहीशी सुधारली असली तरी मागील अनेक वर्षांपासून बँकेची स्थिती नाजूक आहे. त्यामुळेच २९ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन संचालक मंडळाने कमी उलाढालीसह तोट्यात असणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या शाखा बंद करण्याची कार्यवाही झाली नव्हती. साधारणत: वर्षभराने जिल्हा बँकेने त्यातील ९ शाखा बंद केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये शेवाळा आणि बारड या २ शाखांचे नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर ५ शाखा बाबतचा विषय ऐरणीवर होता. मात्र या शाखा बंद केल्यास शेतक-यांना त्रास होईल, जिल्हा बँकेच्या या शाखांमधूनच शासनाच्या विविध योजनांचा निधी दिला जात असल्यानेही शाखा बंद करु नये, अशी संचालक मंडळाची भूमिका होती. मात्र बँकेच्या आर्थिक उलाढालीत दिवसेंदिवस घट होत गेल्याने तोटाही वाढत गेला. पर्यायाने या शाखांची स्थिती सुधारत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ८ जून रोजी जिल्ह्यातील मांजरम, कलंबर, बारुळ, उस्माननगर आणि गणेशनगर (नांदेड) या ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर शाखा बंद केल्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा अग्रणी बँकेला पाठविण्यात आले असून रिझर्व्ह बँकेलाही याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान, बँकेने मोठ्या संस्थांकडील वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.---शेजारच्या शाखेतून होणार व्यवहारजिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने तोट्यात चालणाºया ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या भागातील सभासदांच्या सोयीसाठी या शाखा परिसरातील सभासदांना नजीकच्या शाखेशी जोडून देण्यात आले आहे. कलंबर शाखेतील सभासद सोनखेडशी, बारुळ शाखेचे चिखलीशी, उस्माननगर शाखेचे शिराढोणशी, मांजरम शाखेचे नायगावशी तर गणेशनगर येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे जिल्हा बँकेच्या नांदेड येथील जिल्हा परिषद शाखेतून व्यवहार होतील, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रBank of Indiaबँक ऑफ इंडिया