शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

नांदेड शहरातील पाणीपुरवठा योजनेतील कामात पारदर्शकतेचा अभावाने अनेक कामे वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 18:38 IST

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत नांदेड महापालिका हद्दीत पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी १२ लाख रुपये केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केले असले तरी या योजने अंतर्गत केली जात असलेली कामे वादाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून कोणती कामे केली जात आहेत, याबाबत अद्यापही पारदर्शकता आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड : केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत नांदेड महापालिका हद्दीत पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी १२ लाख रुपये केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केले असले तरी या योजने अंतर्गत केली जात असलेली कामे वादाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून कोणती कामे केली जात आहेत, याबाबत अद्यापही पारदर्शकता आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमृत अभियानांतर्गत नांदेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी अतिरिक्त वितरण व्यवस्थेचे काम हाती घेण्यात आले आहे. ८ फेब्रुवारी २०१७ रोजी या प्रकल्पास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. आगामी ३० वर्षांतील लोकसंख्या अपेक्षित धरुन पाणीपुरवठा योजनेची कामे महापालिका करणार आहे. त्यामध्ये गांधी पुतळा येथे पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. त्याचवेळी शहराच्या विविध भागात ४५० मि.मी. ते २५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. शहरात जवळपास १३२.५७ कि.मी. लांबीची जलवाहिनी  टाकण्याचे काम या योजनेतून केले जाणार आहे. त्याचवेळी या योजनेतून केली जाणारी कामे वादाच्या भोवर्‍यातच सापडली आहेत.

अमृत योजनेतून शहरातील नगिनाघाट गुरुद्वारा भागात सुरू केलेले काम ऐनवेळी बंद करण्यात आले. विशेष म्हणजे, हे काम संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दोन तासांतच या कामाला आडकाठी आणण्यात आली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सदर उद्घाटनाचा कार्यक्रम आम्हाला माहीतच नव्हता, अशी भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे, या उद्घाटन सोहळ्यास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील तत्कालीन अधिकार्‍यांच्या बदलत्या भूमिकेचे कारण काय? असा प्रश्नही पुढे आला आहे. महापौर शीलाताई भवरे यांच्या  प्रभागातील कामही अमृत योजनेतून सुरू करण्यात आले आहे. या कामाच्या दरम्यानही स्थानिक नगरसेवकांना डावलल्याची तक्रार करण्यात आली होती.

अमृतच्या कामासंदर्भातील तक्रार नगरसेवक गुरुप्रीतकौर सोडी यांनी विधानमंडळ अंदाज समितीकडेही केली आहे. त्यामुळे जवळपास २४ कोटींची ही कामे कुठे केली जात आहे़ याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पारदर्शकता ठेवली जात असल्याने हा निधी कागदावरच खर्च केला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गुरू-त्ता-गद्दी कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा व मलनि:सारणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तीच कामे पुन्हा दाखवून निधीची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिका