शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

नांदेड-मुंबई विमान पुन्हा झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:16 IST

नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई आणि नांदेड- हैदराबाद टू-जेट विमानसेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. तब्बल चार वर्षांनंतर नांदेड-मुंबई विमानसेवा पूर्ववत झाली आहे. या विमानसेवेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ५५ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.आता पुढचे पाऊल म्हणून नांदेड शहराला देशातील इतर महत्वाच्या शहराशी जोडण्यासाठी एअर इंडियाची नांदेड-दिल्ली-अमृृतसर ...

ठळक मुद्देएअर इंडियाची बोर्इंग विमानसेवाही लवकरच - अशोक चव्हाण

नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई आणि नांदेड- हैदराबाद टू-जेट विमानसेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. तब्बल चार वर्षांनंतर नांदेड-मुंबई विमानसेवा पूर्ववत झाली आहे. या विमानसेवेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ५५ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

आता पुढचे पाऊल म्हणून नांदेड शहराला देशातील इतर महत्वाच्या शहराशी जोडण्यासाठी एअर इंडियाची नांदेड-दिल्ली-अमृृतसर अशी विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. एअर इंडिया कंपनीने नांदेड अमृतसर ही विमानसेवा सुरु करण्यासाठीची चाचपणी घेतली आहे. नांदेड अमृतसर हे विमान व्हाया दिल्ली मार्गे सुरु केले तर प्रवाशांची अधिक उपलब्धी होऊ शकते. तसेच देशाची राजधानी दिल्लीला विमानसेवेने जोडता येईल त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या नागरी उड्डान मंत्रालय व एअर इंडियाच्या प्रशासनाशी चर्चा झाली असल्याचे सांगत एअर इंडिया कंपनीमार्फत याबाबतची चाचपणी करण्यात येत असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.

नांदेड-दिल्ली-अमृतसर या विमानसेवेसोबतच मुंबई-कोल्हापूर, मुंबई-सोलापूर, व मुुंबई -अमरावती अशी विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात येणाºया काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असून नांदेड-दिल्ली-अमृतसर अशी विमानसेवा एअर इंडियाकडून लवकरच सुरु होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एअर इंडिया कंपनीच्या बोईंग विमानाची आसनक्षमता जास्तीची आहे. ११७ किंवा १७० आसन व्यवस्था असलेले विमान या मार्गावर चालविल्या जाणार आहे. त्यामुळे हे विमान उतरण्यास आवश्यक असलेली धावपट्टी व इतर सुविधांचा आढावा कंपनीकडून लवकरच घेण्यात येणार असल्याचे समजते.

अमृतसरमार्गे कनेक्टीव्हीटीसाठी प्रयत्ननांदेड -मुंबई विमानसेवा सुरु झाली. ही बाब गुरुद्वारा येथे दर्शनाला येणाºया भाविकांसाठी दिलासा देणारी असल्याचे सचखंड गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष आ. सरदार तारासिंघ यांनी म्हटले आहे. येणाºया काळात नांदेड-मुंबई विमानसेवेला अमृतसर-मुंबई आणि अमृतसर-हैदराबाद अशी कनेक्टीव्हीटी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे झाल्यास अमृतसरहून मुंबई मार्गे नांदेड आणि अमृतसरहून हैदराबाद मार्गे नांदेड असा प्रवासही करता येईल. ३० लाख शीख बांधव विविध देशांत राहतात. त्यांच्यासाठी ही विमानसेवा मोलाची ठरणार असल्याचेही तारासिंह यांनी सांगितले.

नांदेडहून सकाळी १०.३५ ला सुटणार विमानमुंबईहून दुपारी १२़४५ वाजता सुटणारे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नांदेडमध्ये पोहोचेल़ नांदेडहून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबईत दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल़रनवेच्या दुरुस्तीसाठी बंद असलेली नांदेड-हैदराबाद विमानसेवाही १६ नोव्हेंबरपासूनच सुरू झाली.हैदराबाद येथून सकाळी ९ वाजता निघणारे विमान सकाळी १० वाजता नांदेडात तर नांदेडहून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटणारे विमान दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद येथे पोहोचणार आहे.