शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये आदिवासींचा अन्यायाविरूध्द आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:07 IST

नांदेड : राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकाºयांच्या संगनमताने अनुसूचित जमातीच्या काही जातीवर जाणिवपूर्वक अन्याय केल्याचा आरोप करीत आपल्या मागण्यासाठी मन्नेरवारलू, कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ठाकूर, ठाकूर माना, हलबा, तडवी, राजगोंड आदी अनुसूचित जमातीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या़

ठळक मुद्देभाजपा सरकारकडून आदिवासींमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप, शासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकाºयांच्या संगनमताने अनुसूचित जमातीच्या काही जातीवर जाणिवपूर्वक अन्याय केल्याचा आरोप करीत आपल्या मागण्यासाठी मन्नेरवारलू, कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ठाकूर, ठाकूर माना, हलबा, तडवी, राजगोंड आदी अनुसूचित जमातीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या़अनुसूचित जमातीतील जातीना आरक्षणाचा हक्क असताना तो डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना अनुसूचित जमातीमध्ये निर्माण होत आहे़ शासन निर्णयही त्याचपध्दतीने होत असल्याने एका आदिवासी जमातीला राज्यात वेगवेगळे नियम लावले जात असल्याने अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समन्वय समितीच्यावतीने या मोर्चाचे आयोजन केले होते़शहरातील नवा मोंढा मैदानावर गुरूवारी सकाळपासूनच जिल्हाभरातून वेगवेगळ्या वाहनाने लोक दाखल झाले़ बाहेरगावाहून आलेल्या मोर्चेकºयांसाठी शहरात ठिकठिकाणी अन्यदान व पाणी वाटप करण्यात आले़ दुपारी अडीच वाजता निघालेल्या या मोर्चात महिला, तरूणी तसेच युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता़ महापुरूषांच्या नावांचा जयघोष करीत या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले़अनेक मोर्चेकरी हे पारंपारिक आदिवासी वेशभूषेतही दाखल झाले होते़ मोर्चामध्ये स्वयंसेवकांनीही महत्वाची भूमिका बजावताना मोर्चाला शिस्तीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवले़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले़ माजी मंत्री दशरथ भांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासनाची भूमिका हा दलित, आदिवासींच्या विरोधातच राहिल्याचे स्पष्ट केले़समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेशराव अंबुलगेकर यांनीही शासनाकडूनच आदिवासींमध्ये दुजाभाव केला जात असल्याचे सांगितले़ लोकप्रतिनिधींकडून शासनावर दबाव आणून अनुसूचित जमातींसाठी जाचक अटी लादल्या जात आहेत़ शासनाच्या योजनांचा आदिवासींना लाभ मिळू नये हाच यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले़भाजपाचे आ़डॉ़ तुषार राठोड, शिवसेनेचे आ़ सुभाष साबणे यांनीही मोर्चाला हजेरी लावताना आदिवासी तसेच अनुसूचित जमातीतील विविध समाजघटकांच्या मागण्यांना आपला पाठींबा असल्याचे मंचावरून सांगितले़ आदिवासी विकास विभागाने १ जुलै २०१६ रोजी स्थापन केलेली विशेष चौकशी समिती ही मन्नेरवारलू समाजाविरूध्द तसेच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचेही मोर्चेकºयांनी निवेदनात म्हटले़ या विशेष चौकशी समितीकडून होणारी तपासणी थांबवावी व बेकायदेशीर कृती करणाºया अधिकाºयांविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी एकमुखाने यावेळी करण्यात आली़अनुसूचित जमातीतील मन्नेरवारलू, महादेव कोळी तसेच अन्य जातीचे जात वैधता प्रमाणपत्र गेल्या सहा ते सात वर्षापासून दिले जात नसल्याचे अनेकांचे शैक्षणिक नुकसान झाले़ जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी मराठवाड्यात केवळ औरंगाबाद येथे कार्यालया आहे़ या कार्यालयाची जिल्हानिहाय स्थापना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली़ मोर्चासाठी अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेशराव अंबुलगेकर, कार्याध्यक्ष परमेश्वर गोणारे, माजी आ़ गंगाराम ठक्करवाड, सोपानराव मारकवाड, बाबुराव पुजरवाड, मधुकर उन्हाळे, गिरधर मोळके, माजी सभापती मंगाराणी अंबुलगेकर आदींनी परिश्रम घेतले़ ते यशस्वी झाल्याचे दिसून आले़ मोर्चामध्ये अमितकुमार कंठेवाड, अतुल पेद्देवाड, जनार्दन ठाकूर, शंकर बंतलवाड, संजय मोरे, प्रा़नितिन दारमोड, जी़ बी़ गिरोड, डॉ़अमोल कलेटवाड, सदाशिव पुपलवाड, आंबादास आकुलवार आदी सहभागी झाले होते़स्वयंसेवकांनी घडवले स्वच्छतेचे दर्शनगुरूवारी निघालेल्या मोर्चात स्वयंसेवकांनी मोर्चा शिस्तीत जाण्यासाठी प्रयत्न केलेच़ त्याचवेळी मोर्चा संपल्यानंतर स्वयंसेवकांनी मोर्चादरम्यान शहरात पडलेले पाणीपाऊच, प्लास्टिक डिश, पाणी बॉटल्स आदी कचरा उचलला़ मोर्चाच्या शेवटी कचरा एकत्रित करून तो ट्रॅक्टरने शहराबाहेर फेकण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती़ यामुळे मोर्चानंतरही रस्ते स्वच्छ दिसून आले़शहरात मागील वर्षभरात विविध समाजाचे जवळपास ४ ते ५ मोर्चे निघाले़ या मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले होते़ या सर्वच मोर्चात स्वयंसेवकांनी शिस्तीचे तसेच स्वच्छतेचे दर्शन घडवले होते़ हीच परंपरा गुरूवारी निघालेल्या आदिवासी मोर्चात कायम होती़ परिणामी जिल्हाभरातून दाखल झालेल्या हजारो मोर्चेकºयानंतरही शहरात कचरा पडलेला दिसून आला नाही़