शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

आसना नदीवर महापालिकेकडून बंधारा उभारण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे ...

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने १० वर्षांपूर्वी आसना नदीवर पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू केली. पैनगंगेचे पाणी घेऊन उत्तर नांदेडला या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या योजनेसाठीही पाणी कमी पडून लागल्याने आसना नदीवर बंधारा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार महापालिकेने आसना नदीवर बंधारा उभारण्याचे काम ८ दिवसांपासून सुरू केले आहे. हे काम महिनाभरात पूर्ण होईल. त्यावर २८ लाख रुपये खर्च केले जात आहेत. हे काम सुरू करण्यासाठी आसना बंधाऱ्यावर या उन्हाळ्यात पाणी साठवता आले नाही. त्याचवेळी बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करता आला नाही. परिणामी, संपूर्ण ताण विष्णूपुरी प्रकल्पावर आला. यंदा प्रकल्पात पाणी उपलब्ध असले तरी पाणी उपसा करण्यासाठीची तांत्रिक क्षमता मनपाकडे नाही. तब्बल २२ वर्षांपूर्वीचे मनपाचे विद्युत पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यात दुरुस्तीचाही प्रश्न वारंवार येत आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरल्यानंतरही शहराला तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रश्नावर नगरसेवकांनीही चुप्पी साधली आहे, हे विशेष.

८ दिवसांत पाणीप्रश्न सुटेल : महापौर

शहरात पाणी उपलब्ध असूनही ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; परंतु आसना नदीवरील बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे यंदा पाणी घेता आले नसल्याचे महापौर मोहिनी येवनकर यांनी सांगितले. नागरिकांमध्ये असलेला असंतोष आपण समजू शकतो. हा प्रश्न ८ दिवसांत निकाली काढण्यात येईल. त्याचवेळी पाणीपुरवठा विभागाची तांत्रिक क्षमता वाढविण्यासाठी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली असल्याचे महापौर येवनकर म्हणाल्या.

आज तातडीची बैठक - अतिरिक्त आयुक्त

शहरातील पाणीपुरवठ्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी मंगळवारी पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. पाणी उपलब्ध असतानाही शहराला अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. तांत्रिक क्षमतेबाबतही माहिती घेतली जाणार आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडे अपूर्ण माहिती होती. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पाणीप्रश्नावर तोडगा काढला जाईल, असेही मनोहरे म्हणाले.