शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आसना नदीवर महापालिकेकडून बंधारा उभारण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे ...

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने १० वर्षांपूर्वी आसना नदीवर पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू केली. पैनगंगेचे पाणी घेऊन उत्तर नांदेडला या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या योजनेसाठीही पाणी कमी पडून लागल्याने आसना नदीवर बंधारा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार महापालिकेने आसना नदीवर बंधारा उभारण्याचे काम ८ दिवसांपासून सुरू केले आहे. हे काम महिनाभरात पूर्ण होईल. त्यावर २८ लाख रुपये खर्च केले जात आहेत. हे काम सुरू करण्यासाठी आसना बंधाऱ्यावर या उन्हाळ्यात पाणी साठवता आले नाही. त्याचवेळी बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करता आला नाही. परिणामी, संपूर्ण ताण विष्णूपुरी प्रकल्पावर आला. यंदा प्रकल्पात पाणी उपलब्ध असले तरी पाणी उपसा करण्यासाठीची तांत्रिक क्षमता मनपाकडे नाही. तब्बल २२ वर्षांपूर्वीचे मनपाचे विद्युत पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यात दुरुस्तीचाही प्रश्न वारंवार येत आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरल्यानंतरही शहराला तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रश्नावर नगरसेवकांनीही चुप्पी साधली आहे, हे विशेष.

८ दिवसांत पाणीप्रश्न सुटेल : महापौर

शहरात पाणी उपलब्ध असूनही ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; परंतु आसना नदीवरील बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे यंदा पाणी घेता आले नसल्याचे महापौर मोहिनी येवनकर यांनी सांगितले. नागरिकांमध्ये असलेला असंतोष आपण समजू शकतो. हा प्रश्न ८ दिवसांत निकाली काढण्यात येईल. त्याचवेळी पाणीपुरवठा विभागाची तांत्रिक क्षमता वाढविण्यासाठी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली असल्याचे महापौर येवनकर म्हणाल्या.

आज तातडीची बैठक - अतिरिक्त आयुक्त

शहरातील पाणीपुरवठ्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी मंगळवारी पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. पाणी उपलब्ध असतानाही शहराला अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. तांत्रिक क्षमतेबाबतही माहिती घेतली जाणार आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडे अपूर्ण माहिती होती. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पाणीप्रश्नावर तोडगा काढला जाईल, असेही मनोहरे म्हणाले.