शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

आसना नदीवर महापालिकेकडून बंधारा उभारण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे ...

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने १० वर्षांपूर्वी आसना नदीवर पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू केली. पैनगंगेचे पाणी घेऊन उत्तर नांदेडला या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या योजनेसाठीही पाणी कमी पडून लागल्याने आसना नदीवर बंधारा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार महापालिकेने आसना नदीवर बंधारा उभारण्याचे काम ८ दिवसांपासून सुरू केले आहे. हे काम महिनाभरात पूर्ण होईल. त्यावर २८ लाख रुपये खर्च केले जात आहेत. हे काम सुरू करण्यासाठी आसना बंधाऱ्यावर या उन्हाळ्यात पाणी साठवता आले नाही. त्याचवेळी बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करता आला नाही. परिणामी, संपूर्ण ताण विष्णूपुरी प्रकल्पावर आला. यंदा प्रकल्पात पाणी उपलब्ध असले तरी पाणी उपसा करण्यासाठीची तांत्रिक क्षमता मनपाकडे नाही. तब्बल २२ वर्षांपूर्वीचे मनपाचे विद्युत पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यात दुरुस्तीचाही प्रश्न वारंवार येत आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरल्यानंतरही शहराला तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रश्नावर नगरसेवकांनीही चुप्पी साधली आहे, हे विशेष.

८ दिवसांत पाणीप्रश्न सुटेल : महापौर

शहरात पाणी उपलब्ध असूनही ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; परंतु आसना नदीवरील बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे यंदा पाणी घेता आले नसल्याचे महापौर मोहिनी येवनकर यांनी सांगितले. नागरिकांमध्ये असलेला असंतोष आपण समजू शकतो. हा प्रश्न ८ दिवसांत निकाली काढण्यात येईल. त्याचवेळी पाणीपुरवठा विभागाची तांत्रिक क्षमता वाढविण्यासाठी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली असल्याचे महापौर येवनकर म्हणाल्या.

आज तातडीची बैठक - अतिरिक्त आयुक्त

शहरातील पाणीपुरवठ्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी मंगळवारी पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. पाणी उपलब्ध असतानाही शहराला अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. तांत्रिक क्षमतेबाबतही माहिती घेतली जाणार आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडे अपूर्ण माहिती होती. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पाणीप्रश्नावर तोडगा काढला जाईल, असेही मनोहरे म्हणाले.