शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

आसना नदीवर महापालिकेकडून बंधारा उभारण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे ...

नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाने ताण दिल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी खालावली जात होती. त्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने १० वर्षांपूर्वी आसना नदीवर पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू केली. पैनगंगेचे पाणी घेऊन उत्तर नांदेडला या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या योजनेसाठीही पाणी कमी पडून लागल्याने आसना नदीवर बंधारा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार महापालिकेने आसना नदीवर बंधारा उभारण्याचे काम ८ दिवसांपासून सुरू केले आहे. हे काम महिनाभरात पूर्ण होईल. त्यावर २८ लाख रुपये खर्च केले जात आहेत. हे काम सुरू करण्यासाठी आसना बंधाऱ्यावर या उन्हाळ्यात पाणी साठवता आले नाही. त्याचवेळी बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करता आला नाही. परिणामी, संपूर्ण ताण विष्णूपुरी प्रकल्पावर आला. यंदा प्रकल्पात पाणी उपलब्ध असले तरी पाणी उपसा करण्यासाठीची तांत्रिक क्षमता मनपाकडे नाही. तब्बल २२ वर्षांपूर्वीचे मनपाचे विद्युत पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यात दुरुस्तीचाही प्रश्न वारंवार येत आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरल्यानंतरही शहराला तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रश्नावर नगरसेवकांनीही चुप्पी साधली आहे, हे विशेष.

८ दिवसांत पाणीप्रश्न सुटेल : महापौर

शहरात पाणी उपलब्ध असूनही ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; परंतु आसना नदीवरील बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे यंदा पाणी घेता आले नसल्याचे महापौर मोहिनी येवनकर यांनी सांगितले. नागरिकांमध्ये असलेला असंतोष आपण समजू शकतो. हा प्रश्न ८ दिवसांत निकाली काढण्यात येईल. त्याचवेळी पाणीपुरवठा विभागाची तांत्रिक क्षमता वाढविण्यासाठी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली असल्याचे महापौर येवनकर म्हणाल्या.

आज तातडीची बैठक - अतिरिक्त आयुक्त

शहरातील पाणीपुरवठ्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी मंगळवारी पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. पाणी उपलब्ध असतानाही शहराला अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. तांत्रिक क्षमतेबाबतही माहिती घेतली जाणार आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडे अपूर्ण माहिती होती. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पाणीप्रश्नावर तोडगा काढला जाईल, असेही मनोहरे म्हणाले.