शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

मुदखेड काँग्रेस कमिटीकडून तहसीलसमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:49 IST

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा कसलाही विचार न करता शेतकरीविरोधी विधेयके जाणीवपूर्वक शेतकऱ्यावर लादण्यात आली आहेत. ती शेतकरीविरोधी विधेयके ...

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा कसलाही विचार न करता शेतकरीविरोधी विधेयके जाणीवपूर्वक शेतकऱ्यावर लादण्यात आली आहेत. ती शेतकरीविरोधी विधेयके रद्द करा, या मागणीचे निवेदन यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष माधव पाटील कदम, काँग्रेस तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ना. तहसीलदार संजय भोशीकर यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

या शेतीविरोधी विधेयकांमुळे देशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधी पारित केलेली विधेयके तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा. याविरोधी विधेयकाचा विरोधात देशातील व राज्यांमधील सर्व शेतकरी केंद्र शासनाच्या विरोधात तीव्रपणे आंदोलन करीत आहेत; परंतु केंद्र शासनाने हे विधेयक अद्यापही रद्द केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. यावरून असे लक्षात येते की, केंद्र शासनाला शेतकऱ्याचे कसलीही घेणे-देणे नाही. त्यामुळे याबाबत सदर सदरील शेतकरीविरोधी विधेयकाचा मुदखेड शहर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. केंद्र शासनाने तातडीने शेतकरीविरोधी विधेयके रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार, काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष माधव पाटील कदम, नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, सभापती म्हैसाजी भांगे, संचालक भीमराव कल्याणे, माधवराव शिंदे, किशनराव मुंगल, नागोराव जाधव, श्रीराम पाटील आदींसह शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.