शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

किनवट तालुक्यात रेशीम शेती वाढविण्यासाठी मिशन २००० हेक्टर राबविणार - जिल्हाधिकारी डॉ इटनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

नानाजीराव देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रधानसांगवी येथे १२ शेतकरी असून तीन रेशीम शेती मंजूर आहे. नऊ प्रस्तावित आहे. आत्मा ...

नानाजीराव देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रधानसांगवी येथे १२ शेतकरी असून तीन रेशीम शेती मंजूर आहे. नऊ प्रस्तावित आहे. आत्मा अंतर्गत ११ गट स्थापन आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम राबविला. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, नांदेडचे उपवनसंरक्षक आर.ए. सातेलीकर, जिल्हा कृषी अधीक्षक चलवडे, उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, तहसीलदार उत्तम कागणे, बीडीओ सुभाष धनवे, गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, तालुका कृषी अधिकारी बी.बी. मुंडे आदींची उपस्थिती होती.

भारतातील आणि चीनमधील रेशीम उद्योग चांगला आहे. रेशीमला मार्केट जास्त व पैसा जास्त आहे. सध्या चारशे हेक्टर क्षेत्र असून, ते पाचपट झाले पाहिजे, यासाठी मिशन २००० हेक्टर उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. नगदी पैसा मिळत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी ठिबक करून रेशीम शेती करावी, असे जिल्हाधिकारी इटनकर म्हणाले. भांडणतंटे सोडून चांगले कामे करा. अंडीपुंजीसाठी चॉकी सेंटर तयार करा. प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना बेंगळुरूला पाठवा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. रेशीम शेतीसाठी किनवटला सेंटर निर्माण करा, रोजगार मिळेल, असे आवाहन केले.

गावचे सरपंच तथा शेतकरी विठ्ठल किरवले यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली आहे. रेशीम शेडसाठी मस्टरऐवजी अग्रीम द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पद्माकर आरसोड या शेतकऱ्यानेही आपले मत मांडले. मोहपूरचे शेतकरी विश्वनाथ खुडे यांनी तीन वर्षांच्या रेशीम शेतीचा अनुभव कथन केला. मेहनत कमी उत्पादन जास्त रेशीम शेती ही शेतकऱ्यांना परवडणारी असल्याचे खुडे यांनी सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांसह बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, वनक्षेत्रपाल के.एन. खंदारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आत्माचे शिवप्रसाद पटवे यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी गोकुंदा येथील गोणारकर यांच्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या शिवरामखेडा येथील मधसंकलन केंद्राला भेट दिली. तर अंबाडी येथील अभि. प्रशांत ठमके यांच्या शेतातील सामूहिक शेततळेमधील मत्स्यव्यवसायाला भेट दिली.