शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

किनवट तालुक्यात रेशीम शेती वाढविण्यासाठी मिशन २००० हेक्टर राबविणार - जिल्हाधिकारी डॉ इटनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

नानाजीराव देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रधानसांगवी येथे १२ शेतकरी असून तीन रेशीम शेती मंजूर आहे. नऊ प्रस्तावित आहे. आत्मा ...

नानाजीराव देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रधानसांगवी येथे १२ शेतकरी असून तीन रेशीम शेती मंजूर आहे. नऊ प्रस्तावित आहे. आत्मा अंतर्गत ११ गट स्थापन आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम राबविला. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, नांदेडचे उपवनसंरक्षक आर.ए. सातेलीकर, जिल्हा कृषी अधीक्षक चलवडे, उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, तहसीलदार उत्तम कागणे, बीडीओ सुभाष धनवे, गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, तालुका कृषी अधिकारी बी.बी. मुंडे आदींची उपस्थिती होती.

भारतातील आणि चीनमधील रेशीम उद्योग चांगला आहे. रेशीमला मार्केट जास्त व पैसा जास्त आहे. सध्या चारशे हेक्टर क्षेत्र असून, ते पाचपट झाले पाहिजे, यासाठी मिशन २००० हेक्टर उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. नगदी पैसा मिळत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी ठिबक करून रेशीम शेती करावी, असे जिल्हाधिकारी इटनकर म्हणाले. भांडणतंटे सोडून चांगले कामे करा. अंडीपुंजीसाठी चॉकी सेंटर तयार करा. प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना बेंगळुरूला पाठवा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. रेशीम शेतीसाठी किनवटला सेंटर निर्माण करा, रोजगार मिळेल, असे आवाहन केले.

गावचे सरपंच तथा शेतकरी विठ्ठल किरवले यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली आहे. रेशीम शेडसाठी मस्टरऐवजी अग्रीम द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पद्माकर आरसोड या शेतकऱ्यानेही आपले मत मांडले. मोहपूरचे शेतकरी विश्वनाथ खुडे यांनी तीन वर्षांच्या रेशीम शेतीचा अनुभव कथन केला. मेहनत कमी उत्पादन जास्त रेशीम शेती ही शेतकऱ्यांना परवडणारी असल्याचे खुडे यांनी सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांसह बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, वनक्षेत्रपाल के.एन. खंदारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आत्माचे शिवप्रसाद पटवे यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी गोकुंदा येथील गोणारकर यांच्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या शिवरामखेडा येथील मधसंकलन केंद्राला भेट दिली. तर अंबाडी येथील अभि. प्रशांत ठमके यांच्या शेतातील सामूहिक शेततळेमधील मत्स्यव्यवसायाला भेट दिली.