शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापौर,जि.प. अध्यक्षही आता थेट जनतेतून निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:42 IST

देशात ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीने झालेल्या स्थानिक संस्थाच्या बळकटीकरणात आता पदाधिका-यांसह लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण आवश्यक आहे. आजही स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासनच वरचढ असल्याने लोकप्रतिनिधीचे महत्त्व म्हणावे तसे वाढले नसल्याचा सूर नांदेडमध्ये झालेल्या विभागीय परिषदेतील खुल्या चर्चासत्रात उमटला. दरम्यान, सरपंच, नगराध्यक्षाप्रमाणेच महापालिकेचे महापौर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचीही थेट जनतेतून निवड व्हावी, अशी मागणीही यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी केली.

ठळक मुद्देविभागीय परिषद : स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : देशात ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीने झालेल्या स्थानिक संस्थाच्या बळकटीकरणात आता पदाधिका-यांसह लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण आवश्यक आहे. आजही स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासनच वरचढ असल्याने लोकप्रतिनिधीचे महत्त्व म्हणावे तसे वाढले नसल्याचा सूर नांदेडमध्ये झालेल्या विभागीय परिषदेतील खुल्या चर्चासत्रात उमटला. दरम्यान, सरपंच, नगराध्यक्षाप्रमाणेच महापालिकेचे महापौर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचीही थेट जनतेतून निवड व्हावी, अशी मागणीही यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी केली.बुधवारी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर विभागीय परिषद झाली. या परिषदेतील खुल्या चर्चासत्रात नागरिक, प्रतिनिधी तसेच पदाधिका-यांनी आपली मते मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी तसेच निकोप लोकशाहीसाठी निवडणूक आयोगाने या परिषदेतून सूचना मागविल्या आहेत. यातील योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. समारोपीय सत्रास उपस्थित असलेल्या कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, औरंगाबाद महापालिकेचे माजी नगरसेवक एम. ए. पठाण, सामाजिक कार्यकर्ते माधवराव पाटील शेळगावकर यांच्या उपस्थितीत सूचना केल्या. या सूचनामध्ये पदाधिका-यांना आजही प्रशासनाच्या मर्जीनेच चालावे लागते. ही बाब अधोरेखित करुन पदाधिका-यांना काही अधिकार द्यावे, अशी सूचना करण्यात आली. त्याचवेळी नगराध्यक्ष, सरपंच ही पदे थेट जनतेतून निवडली जात आहेत. त्याप्रमाणेच महापौरांसह पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षांची निवडही जनतेतूनच झाली पाहिजे, अशी सूचनाही यावेळी पुढे आली तर जनतेतून निवडलेल्या सरपंचांना गावातील इतर समित्यांचे अध्यक्षपदही द्यावे, अशी सूचना काहींनी केली. गावात सरपंच असताना शालेय व्यवस्थापन समिती, पाणी व्यवस्थापन समिती अशा विविध समित्यांवर इतरांची निवड केली जाते. ग्रामपातळीवर काम करताना यातून वाद होत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मतदानही नागरिकांना सक्तीचे करण्याची गरज असल्याचा सूर यावेळी उमटला.स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण कालावधीही आमदारांप्रमाणे जास्त असावा, त्यातून लोकप्रतिनिधीला काम करण्याची संधी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.नागरिक, लोकप्रतिनिधींच्या सूचना, प्रश्नांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. समारोपप्रसंगी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी लोकशाही बळकटीकरणात सुजाण नागरिक आवश्यक असल्याचे सांगितले.