शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गुन्ह्यांचे आकडे कमी म्हणजे बर्किंगचा धाेका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:22 IST

नांदेड : गुन्हेगारी घटली हे दाखविण्यासाठी आकडे कमी नाेंदविले जातात; परंतु त्यात वास्तव तेवढे नसते, अनेकदा गुन्हेगारी कमी दाखविण्यासाठी ...

नांदेड : गुन्हेगारी घटली हे दाखविण्यासाठी आकडे कमी नाेंदविले जातात; परंतु त्यात वास्तव तेवढे नसते, अनेकदा गुन्हेगारी कमी दाखविण्यासाठी चक्क गुन्हा दडपण्याचे (बर्किंग) प्रकार घडतात. अशा प्रकरणात ताेच धाेका अधिक असताे. हे निरीक्षण आहे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी यांचे.

महानिरीक्षक तांबाेळी यांनी ‘लाेकमत’शी विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, मी एवढ्या वर्षांत गुन्ह्यांची संख्या का वाढली म्हणून कधी कुणाला जाब विचारला नाही, मेमाे दिला नाही किंवा नाेटीस दिली नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षी गुन्ह्यांची संख्या वाढलेली दिसत असेल, तर पाेलीस यंत्रणेने गुन्हे दाखल करून घेण्यात हयगय केली नाही किंवा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला नाही, असे आपण मानताे. जेथे गुन्हे कमी झाल्याचे दाखविले जाते तेथे गुन्हे बर्किंगचा संशय अधिक राहताे. काेणत्याही परिस्थितीत गुन्हे बर्किंग करू नका, आकडे वाढले तरी चालतील, फिर्याद नाेंदवून घ्या, खातरजमा करून गुन्हा दाखल करा, तपास करून ताे डिटेक्ट करा, अशा स्पष्ट सूचना आपण चारही जिल्ह्यांतील ठाणेदारांना दिल्या असल्याचे तांबाेळी यांनी सांगितले. नांदेड परिक्षेत्रात एकीकडे चाेऱ्या वाढल्या आहेत, तर दुसरीकडे घरफाेड्यांची संख्या कमी झाल्याचे दाखविले जात आहे. मात्र, ही बाब संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहन चाेरीत बिलाेली, देगलूर कनेक्शन

नांदेड शहरातील वाहन चाेरीत बिलाेली, देगलूर कनेक्शन वारंवार उघड झाले आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात गुन्हेगारी वाढण्यामागे काेराेना, लाॅकडाऊन हेसुद्धा एक प्रमुख कारण पुढे आले आहे. काेराेना संसर्गाच्या भीतीने आराेपींना तातडीने जामीन दिला जात हाेता. मात्र, ते कारागृहातून बाहेर येताच पुन्हा गुन्हा करीत असल्याचे आढळून आले. अशा गुन्हेगारांवर सतत वाॅच ठेवण्याच्या सूचना पाेलिसांना देण्यात आल्या आहेत.

अपघात, चाेरी व बेवारस वाहनांची पाेलीस ठाण्यांच्या आवारात झालेली गर्दी कमी करण्यात आली आहे. त्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट आहे. अपघातातील वाहन नेण्यास संबंधित मालक तयार नसल्याने त्याच्या घरापर्यंत ते वाहन पाेहाेचून देण्याचे साैजन्य दाखविले आहे. अनेक ठाण्यांतील वाहनांचा लिलाव झाला असून, इतर ठाण्यांतील वाहनांचा लिलाव हाेणार आहे.

चाैकट...

ठाणे-वसाहत इमारतींचा प्रश्न गंभीर

पाेलीस ठाणे व निवासी वसाहतींचा प्रश्न परिक्षेत्रात माेठा आहे. लातूरमध्ये तर जुन्या इमारतींमध्ये पाेलीस ठाणे चालविले जात आहे. हे धाेकादायकही आहे. त्यामुळेच परिक्षेत्रात नव्या इमारतींचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. नांदेडमधील स्नेहनगर ही पाेलीस वसाहत जुनी झाली असून, माेडकळीस आली आहे. तेथे आता रिपेअरिंग शक्य नाही, ती इमारत पाडून नव्याने बांधणे हाच मार्ग असल्याचे तांबाेळी यांनी सांगितले.

चाैकट...

मनुष्यबळ व्यवस्थापन हवे

काेणत्याही पाेलीस ठाण्यात गेल्यास मनुष्यबळ पुरेसे नाही, कमी आहे हे सातत्याने सांगितले जाते. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाचा खराेखरच किती वापर करून घेतला जाताे, हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापनावर भर देण्याची आवश्यकता पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी यांनी व्यक्त केली.