शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेक द चेन’अंतर्गत टाळेबंदी कालावधी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST

जिल्ह्यात ३० एप्रिलच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. इतर ...

जिल्ह्यात ३० एप्रिलच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. इतर सर्व व्यवहारांवर निर्बंध होते. १२ मेच्या आदेशानुसार राज्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत टाळेबंदीचा कालावधी १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचवेळी आणखी काही अतिरिक्त निर्बंध लागू राहतील, असे आदेशित केले आहे. ३० एप्रिल रोजी काढलेल्या आदेशाला मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. त्यानुसार राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक केला आहे. ग्रामीण भागातील बाजार व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने विशेष निगराणी ठेवावी, असे निर्देश स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले आहेत. दूध संकलन, वाहतूक प्रक्रिया निर्बंधांशिवाय सुरू राहील; परंतु अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार किंवा होम डिलिव्हरीवर जी बंधने आहेत त्या बंधनांसह किरकोळ विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. विशिष्ट भागाकरिता आवश्यक असल्यास काही निर्बंध स्थानिक आपत्ती प्राधिकरण लावू शकेल. या नव्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, नांदेड मनपाचे आयुक्त, सर्व न.प.चे मुख्याधिकारी यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नांदेड- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मेपर्यंत लागू करण्यात आलेली टाळेबंदी १ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे १४ मार्च रोजी घोषित केलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना १ जूनपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.

जिल्ह्यात ३० एप्रिलच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. इतर सर्व व्यवहारांवर निर्बंध होते. १२ मेच्या आदेशानुसार राज्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत टाळेबंदीचा कालावधी १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याचवेळी आणखी काही अतिरिक्त निर्बंध लागू राहतील, असे आदेशित केले आहे. ३० एप्रिल रोजी काढलेल्या आदेशाला मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. त्यानुसार राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक केला आहे. ग्रामीण भागातील बाजार व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने विशेष निगराणी ठेवावी, असे निर्देश स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले आहेत. दूध संकलन, वाहतूक प्रक्रिया निर्बंधांशिवाय सुरू राहील; परंतु अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार किंवा होम डिलिव्हरीवर जे बंधने आहेत त्या बंधनांसह किरकोळ विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. विशिष्ट भागाकरिता आवश्यक असल्यास काही निर्बंध स्थानिक आपत्ती प्राधिकरण लावू शकेल. या नव्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, नांदेड मनपाचे आयुक्त, सर्व न.प.चे मुख्याधिकारी यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.