शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

लिंगापूरमध्ये एकाच दिवशी २९ पॉझिटिव्ह तर दोघींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST

शहरी भागात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथे कोरोना प्रादुर्भावाने हाहाकार माजला ...

शहरी भागात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथे कोरोना प्रादुर्भावाने हाहाकार माजला आहे. एकाच दिवशी एखाद्या गावात एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळून येणारे लिंगापूर हे जिल्ह्यातील पहिलेच गाव असावे. परिणामी, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लिंगापूर येथील आरोग्य उपकेंद्रात दोन दिवस गावकऱ्यांची आरटीपीसीआरद्वारे तपासणी केली. जवळपास १४७ जणांपैकी ३१ जण पॉझिटिव्ह आले. त्यापैकी दोन महिलांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना आखल्या जात आहेत.

दरम्यान, गावकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. काही लक्षणे असतील तर लगेचच तपासणी करून घ्यावी. घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भागवत देवसरकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष परसराम पाटील देवसरकर, सुनील देवसरकर, संतोष देवसरकर, जयंतराव देवसरकर, अविनाश देवसरकर, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई कवडे, परसराम कवडे, संदीप कवडे, सुभाष कवडे यांनी केले आहे.

प्रशासनाने याेग्य उपाययोजना कराव्यात

रुग्णांना तातडीने कोविड सेंटरमध्ये हलवावे व गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायतीने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी तालुका प्रशासनाकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

संपूर्ण गावाची होणार तपासणी

आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत हा आकडा आला आहे. प्रशासनाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या असून गरजेनुसार रुग्णाने कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटरमध्ये भरती केले जात आहे. गाव सॅनिटायझिंग करण्यात आले असून लवकरच गावातील सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. - जीवराज डापकर, तहसीलदार, हदगाव

धार्मिक कार्यक्रमास जबाबदार कोण?

लिंगापूरमध्ये एकाच दिवशी २९ रुग्ण आढळून आल्याने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी गावात एक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये गावातील तसेच परिसरातील नागरिक आणि पाहुण्यांचाही समावेश होता. कार्यक्रमांवर निर्बंध असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास कोण जबाबदार, ग्रामपंचायतीने अथवा सरपंच, ग्रामसेवकांनी या कार्यक्रमास का विरोध केला नाही, अथवा प्रशासनास कळविले नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.