शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

लिंगापूरमध्ये एकाच दिवशी २९ पॉझिटिव्ह तर दोघींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST

शहरी भागात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथे कोरोना प्रादुर्भावाने हाहाकार माजला ...

शहरी भागात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथे कोरोना प्रादुर्भावाने हाहाकार माजला आहे. एकाच दिवशी एखाद्या गावात एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळून येणारे लिंगापूर हे जिल्ह्यातील पहिलेच गाव असावे. परिणामी, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लिंगापूर येथील आरोग्य उपकेंद्रात दोन दिवस गावकऱ्यांची आरटीपीसीआरद्वारे तपासणी केली. जवळपास १४७ जणांपैकी ३१ जण पॉझिटिव्ह आले. त्यापैकी दोन महिलांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना आखल्या जात आहेत.

दरम्यान, गावकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. काही लक्षणे असतील तर लगेचच तपासणी करून घ्यावी. घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भागवत देवसरकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष परसराम पाटील देवसरकर, सुनील देवसरकर, संतोष देवसरकर, जयंतराव देवसरकर, अविनाश देवसरकर, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई कवडे, परसराम कवडे, संदीप कवडे, सुभाष कवडे यांनी केले आहे.

प्रशासनाने याेग्य उपाययोजना कराव्यात

रुग्णांना तातडीने कोविड सेंटरमध्ये हलवावे व गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायतीने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी तालुका प्रशासनाकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

संपूर्ण गावाची होणार तपासणी

आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत हा आकडा आला आहे. प्रशासनाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या असून गरजेनुसार रुग्णाने कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटरमध्ये भरती केले जात आहे. गाव सॅनिटायझिंग करण्यात आले असून लवकरच गावातील सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. - जीवराज डापकर, तहसीलदार, हदगाव

धार्मिक कार्यक्रमास जबाबदार कोण?

लिंगापूरमध्ये एकाच दिवशी २९ रुग्ण आढळून आल्याने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी गावात एक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये गावातील तसेच परिसरातील नागरिक आणि पाहुण्यांचाही समावेश होता. कार्यक्रमांवर निर्बंध असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास कोण जबाबदार, ग्रामपंचायतीने अथवा सरपंच, ग्रामसेवकांनी या कार्यक्रमास का विरोध केला नाही, अथवा प्रशासनास कळविले नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.