शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

निर्बंध उठवा, पण नियमांचे पालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रतिष्ठाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. तसेच ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रतिष्ठाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. तसेच शनिवार आणि रविवार कडकडीत बंद ठेवण्यात यावा, असे आदेश काढले होते. जिल्ह्यात सुरुवातीचे काही दिवस नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. आता मात्र कारवाई करणाऱ्या पथकाकडूनही कानाडोळा करण्यात येत असल्यामुळे चार वाजल्यानंतरही बाजारपेठ अर्धे शटर उघडे ठेवून सुरूच आहे. अशाप्रकारे लपून-छपून व्यवसाय करण्यापेक्षा निर्बंध उठवावेत, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. जेणेकरून खरेदीसाठी नागरिकांची एकाचवेळी गर्दी होणार नाही. तसेच व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार नाही. परंतु त्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा तिसरी लाट आल्यास आणखी लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याची भीतीही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

ठरलेल्या वेळेत ग्राहकांनी यावे

सध्या सुरू असलेले निर्बंध उठविल्यास धोका होऊ शकतो. कारण पूर्वीच्या अनुभवाप्रमाणे नागरिक नियमांच्याबाबतीत बेफिकीर आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढू शकतो. सध्या सायंकाळी चार वाजेपर्यंतची परवानगी आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्या वेळेपर्यंत येऊन खरेदी करणे अपेक्षित आहे, असेही अनधिकृतपणे बरीच मार्केट सुरूच आहेत. - हर्षद शहा, मर्चंट असोसिएशन अध्यक्ष

निर्बंध उठविणे गरजेचे

प्रशासनाने सध्याचे निर्बंध उठविण्याची गरज आहे. कोरोनामुळे सराफासह इतर व्यापारी देशोधडीला लागले आहेत. परंतु निर्बंध उठविताना नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. शासन लोकांचे जीव वाचावेत म्हणून धडपड करीत आहे. परंतु नागरिक मात्र बिनधास्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. - सुधाकर टाक, सराफा असोसिएशन अध्यक्ष