शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नववीत शाळा नको म्हणून घर सोडले, 'बीए' ला प्रवेश घेताच आधारसाठी फोन केला अन सापडला

By शिवराज बिचेवार | Updated: September 20, 2022 18:35 IST

घरचे शाळेत पाठवत असल्याने पळालेला ज्ञानेश्वर हा औरंगाबाद येथे गेला होता.

नांदेड : आई-वडील शाळेत जाण्याचा तगादा लावत असल्याने इयत्ता नववीतील मुलाने घर सोडले. जवळपास साडेचार वर्षांपासून तो बेपत्ता होता. परंतु, याच काळात कोणत्याही वाईट वळणाला न लागता त्याने बी. ए.पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरी वडिलांना आलेल्या एका निनावी फोनवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या मुलाचा शोध लावला. मुलाला समोर पाहताच आई-वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

नागोबा ज्ञानोबा पेद्दे (रा. भोसी, ता. बिलोली) यांचा मुलगा ज्ञानेश्वर याला शाळेत जाण्याचा कंटाळा होता. नववीत असताना शाळेत जातो म्हणून घराबाहेर पडायचा अन् गावभर फिरायचा. ही बाब नागोबा पेद्दे यांना कळल्यानंतर त्यांनी शाळा गाठली. परंतु, वडिलांना समोर पाहताच ज्ञानेश्वरने धूम ठोकली. तो घरी परत आलाच नाही. पेद्दे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. परंतु, त्याचा शोध लागत नव्हता. ही घटना १६ मार्च २०१८ रोजी घडली. परंतु, दोन दिवसांपूर्वीच पेद्दे यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच त्या क्रमांकावर संपर्क साधून लोकेशन काढले. 

सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या ज्ञानेश्वरला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आघाव यांनी बोलते केले. तो बेपत्ता झाल्यापासून त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली, हे पटवून दिले. त्यालाही आघाव यांचे म्हणणे पटले. त्यानंतर औरंगाबाद येथून ज्ञानेश्वरला आणण्यात आले. मंगळवारी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, पोनि. द्वारकादास चिखलीकर यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. यावेळी आई-वडील आणि ज्ञानेश्वर या तिघांनी एकमेकांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

आधारकार्डसाठी केला होता फोनज्ञानेश्वर याने घरातून बाहेर पडल्यानंतर साडेचार वर्षांत घरी एकदाही संपर्क केला नाही. परंतु, एका कामासाठी त्याला आधारकार्डची गरज होती. त्यासाठी वडिलांना अनोळखी क्रमांकावर कॉल केला अन् पोलिसांनी त्यावरून त्याचा काैशल्यपूर्णरित्या शोध घेतला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आघाव यांनी ज्ञानेश्वरला विश्वासात घेऊन त्याची माहिती मिळवली.

शाळा नको म्हणून पळाला अन् बी. ए. झालाघरचे शाळेत पाठवत असल्याने पळालेला ज्ञानेश्वर हा औरंगाबाद येथे गेला होता. याठिकाणी मात्र त्याला शिक्षण सोडल्याचा पश्चाताप झाला. येथे हाती पडेल ते काम करून त्याने मुक्त विद्यापीठातून बी. ए. प्रथम वर्षापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता मात्र पुढील शिक्षण तो नांदेडलाच घेणार आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडEducation Sectorशिक्षण क्षेत्र