शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

धर्माबाद शासकीय रुग्णालयात यंत्रसामग्रीच्या अभावामुळे रुग्णांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

धर्माबाद : शहरातील शासकीय रुग्णालयात यंत्रसामूग्रीचा अभाव व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने छोट्या-छोट्या घटनेला रुग्णांना नांदेड, निझामाबाद, हैदराबाद येथे ...

धर्माबाद : शहरातील शासकीय रुग्णालयात यंत्रसामूग्रीचा अभाव व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने छोट्या-छोट्या घटनेला रुग्णांना नांदेड, निझामाबाद, हैदराबाद येथे हलवावे लागत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय तर होतच आहे, त्याबरोबर आर्थिक फटका बसत आहे. याचा त्रास सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना होत आहे. हे रुग्णालय असून नसल्यासारखे असल्याने, या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांनी केले आहे.

धर्माबाद शहर हे महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने नेहमीच विकासाच्या बाबतीत उपेक्षित आहे. धर्माबाद शहरात शासकीय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाल्यापासून भव्य इमारत सोडली तर बाकी रुग्णालयात काही बदल झाला नाही. एक्स-रे मशीन असून नसलेल्या सारखे आहे. सोनोग्राफी, इतर मशनरी अद्याप नसून अनेक बाबींच्या घटना घडल्याने, तपासणी करता येत नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड तर होतेच, त्याबरोबर बाहेर हलविताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अपघात, विविध प्रकारचे ऑपरेशन, महिलांचे सिझर ऑपरेशन, विविध, शस्त्रक्रिया, तात्काळ उपचार, नवजात अर्भक काळजी, कान, घसा, दंतरोग, नेत्ररोग, हृदयरोग व यासारख्या अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभावामुळे बारीक सारीख गोष्टीलाही बाहेर रुग्णांना हलवावे लागते. नांदेड शंभर, निझामाबाद पन्नास व हैदराबाद चारशे किमी अंतरावर असल्याने दोन ते आठ तासांचा अवधी लागत असल्याने अति गंभीर रुग्ण वेळेवर पोहोचत नसल्याने वाटेतच रुग्णाचा मृत्यू होत आहे. अशा अनेक घटना धर्माबादेत घडल्या आहेत.

त्यासाठी येथील शासकीय रुग्णालयाची इमारत भव्य असून परिसरही मोठा आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होण्यास भौगोलिदृष्ट्या काहीच अडचण होऊ शकत नाही. विविध तज्ज्ञ डॉक्टरांची व यंत्रसामग्रीची उपलब्धता होते. त्यामुळे रुग्णांना नांदेड, निजामाबाद यासारख्या ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल तसेच मृत्यूदरातही घट होईल. त्यामुळे धर्माबाद मध्ये उपजिल्हा रुग्णालय ही आवश्यक बाब असून प्रशासनाने तातडीने ती मंजूर करणे गरजेचे आहे; पण सदरील मागणीस मूर्त स्वरूप येत नसल्याने रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा बाजार समितीचे संचालक रमेश गौड यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी लावून धरली असून जनआंदोलन करण्याचा पवित्रा धरला आहे.