शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

धर्माबाद शासकीय रुग्णालयात यंत्रसामग्रीच्या अभावामुळे रुग्णांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST

धर्माबाद : शहरातील शासकीय रुग्णालयात यंत्रसामूग्रीचा अभाव व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने छोट्या-छोट्या घटनेला रुग्णांना नांदेड, निझामाबाद, हैदराबाद येथे ...

धर्माबाद : शहरातील शासकीय रुग्णालयात यंत्रसामूग्रीचा अभाव व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने छोट्या-छोट्या घटनेला रुग्णांना नांदेड, निझामाबाद, हैदराबाद येथे हलवावे लागत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय तर होतच आहे, त्याबरोबर आर्थिक फटका बसत आहे. याचा त्रास सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना होत आहे. हे रुग्णालय असून नसल्यासारखे असल्याने, या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांनी केले आहे.

धर्माबाद शहर हे महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने नेहमीच विकासाच्या बाबतीत उपेक्षित आहे. धर्माबाद शहरात शासकीय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाल्यापासून भव्य इमारत सोडली तर बाकी रुग्णालयात काही बदल झाला नाही. एक्स-रे मशीन असून नसलेल्या सारखे आहे. सोनोग्राफी, इतर मशनरी अद्याप नसून अनेक बाबींच्या घटना घडल्याने, तपासणी करता येत नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड तर होतेच, त्याबरोबर बाहेर हलविताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अपघात, विविध प्रकारचे ऑपरेशन, महिलांचे सिझर ऑपरेशन, विविध, शस्त्रक्रिया, तात्काळ उपचार, नवजात अर्भक काळजी, कान, घसा, दंतरोग, नेत्ररोग, हृदयरोग व यासारख्या अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभावामुळे बारीक सारीख गोष्टीलाही बाहेर रुग्णांना हलवावे लागते. नांदेड शंभर, निझामाबाद पन्नास व हैदराबाद चारशे किमी अंतरावर असल्याने दोन ते आठ तासांचा अवधी लागत असल्याने अति गंभीर रुग्ण वेळेवर पोहोचत नसल्याने वाटेतच रुग्णाचा मृत्यू होत आहे. अशा अनेक घटना धर्माबादेत घडल्या आहेत.

त्यासाठी येथील शासकीय रुग्णालयाची इमारत भव्य असून परिसरही मोठा आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होण्यास भौगोलिदृष्ट्या काहीच अडचण होऊ शकत नाही. विविध तज्ज्ञ डॉक्टरांची व यंत्रसामग्रीची उपलब्धता होते. त्यामुळे रुग्णांना नांदेड, निजामाबाद यासारख्या ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल तसेच मृत्यूदरातही घट होईल. त्यामुळे धर्माबाद मध्ये उपजिल्हा रुग्णालय ही आवश्यक बाब असून प्रशासनाने तातडीने ती मंजूर करणे गरजेचे आहे; पण सदरील मागणीस मूर्त स्वरूप येत नसल्याने रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा बाजार समितीचे संचालक रमेश गौड यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी लावून धरली असून जनआंदोलन करण्याचा पवित्रा धरला आहे.