शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कृषिधन ! शेळीने पाच पिलांना दिला जन्म; शेतकऱ्याने गावभर पेढे वाटून केला जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 15:36 IST

कमठालातांडा येथील रहिवासी गोविंद धुपा जाधव हे शेती करतात. त्यांनी शेतीला शेळी पालनाची जोड दिली आहे.

किनवट ( नांदेड ) : शेळीस जुळे किंवा तिळे जन्मलेले ऐकण्यात आले. मात्र,  किनवट तालुक्यातील कमठालातांडा येथील एका शेतकऱ्याच्या शेळीने चक्क पाच पिलांना जन्म दिला आहे. बुधवारी ( दि. २७ ) जन्मलेले पाचही पिल निरोगी आणि सुदृढ आहेत. यामुळे शेतकऱ्याने गावभर पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.  

तालुक्यातील कमठालातांडा येथील रहिवासी गोविंद धुपा जाधव हे शेती करतात. त्यांनी शेतीला शेळी पालनाची जोड दिली आहे. त्यांच्याकडे दहा शेळ्या आहेत. शेतीचे काही उत्पन्न आणि शेळ्यांची विक्री यावर त्यांच्या उदरनिर्वाह चालतो. दहा शेळ्यांपैकी एका शेळीने बुधवारी ( दि. २७) चक्क पाच पिलांना जन्म दिला. त्यातील एक पाट असून चार बोकड आहेत. पाचही पिल्ल सुदृढ असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शेतकरी गोविंद जाधव यांनी मित्रमंडळीसह संपूर्ण गावात पेढे वाटून हा आनंद साजरा केला.

दरम्यान, शेळीने पाच पिल्लांना जन्म दिल्याची वार्ता पंचक्रोशीत पसरली आहे. यामुळे अनेक ग्रामस्थ कुतुहलाने ही पिल्ल पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेकांनी शेळीला जुळे, तिळे कधीतरी चार पिल्ल झाल्याचे पाहिल्याचे सांगितले. मात्र, शेळीला एकाच वेळी पाच पिल्ल होणे ही अभूतपूर्व घटना असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNandedनांदेडFarmerशेतकरी