शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे क्रांतिगुरू लहुजी साळवे -प्रा.भुयारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:48 IST

येथील विठ्ठलनगर सांस्कृतिक सभागृहात आयोजित क्रांतिगुरु लहुजी राघोजी साळवे यांच्या २२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते क्रांतिगुरु लहुजी साळवे ...

येथील विठ्ठलनगर सांस्कृतिक सभागृहात आयोजित क्रांतिगुरु लहुजी राघोजी साळवे यांच्या २२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भारत खडसे हे होते. तर उद्‌घाटन इंजि. भाऊसाहेब घोडे यांनी केले.

प्रा.सदाशिव भुयारे म्हणाले, १८१७ च्या खडकीच्या पेशवे आणि ब्रिटिशांच्या लढाईत राघोजी साळवे यांनी हजारो ब्रिटिश सैनिकांचा शिरच्छेद करून तब्बल ४ दिवस खिंड लढवली होती. दुसरा बाजीराव यांच्या पळकुट्यापणामुळे राघोजी साळवे यांना शहीद व्हावे लागले. त्याचवेळी वडील राघोजी साळवे यांच्या विरमरणाची रक्त आपल्या कपाळावर लावून क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी शपथ घेतली की ‘जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी’ खडकीच्या लढाईत राघोजी साळवे शहीद झाल्यामुळे दुसरा बाजीराव पळून जाऊन कोरेगाव भीमा येथे लपून बसला होता. त्यावेळी ५०० ब्रिटिश महार बटालियनच्या सैन्याचा २८ हजार पेशव्यांचा दारुण पराभव केला होता. कोरेगाव भीमाच्या लढाईमुळे दुसऱ्या बाजीरावांचा अंत व शस्त्रधारी पेशवाईचा अंत झाला. परंतु क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी हार मानली नाही. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा तीव्र करण्यासाठी पुणे येथे गंजपेठेत क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्यासाठी सशस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू केले ज्यात तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, राष्ट्रपिता जाेतिराव फुले, बाळ गंगाधर टिळक यासारख्या असंख्य सशस्त्र क्रांतिकारकांना घडवले, असे प्रतिपादन प्रा.भुयारे यांनी केले.

प्रास्ताविक प्रदीपअण्णा वाघमारे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. राज सूर्यवंशी यांनी तर आभार गणेश मोरे यांनी मानले. कार्यक्रमास पोचीराम कांबळे यांचे नातू ज्युनियर कांबळे, काळे, चंद्रकांत गुंडाळे, पांडुरंग गायकवाड, उत्तम हातागळे, चेतक काळे, बी.एस. घोणसेटवाड, बाबू कांबळे, उत्तम आंबेकर, प्रसाद गायकवाड, विशाल केदारे, तपासकर, वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.