शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृषी आयुक्तालयाच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: June 14, 2017 00:28 IST

नांदेड :विमा कंपनीकडून कृषी विभागाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केळी उत्पादकांना पीकविमा मिळण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत कृषी आयुक्तालयाकडून कृषी विमा कंपनीला नुकसान भरपाईचा अहवाल सादर करण्यासाठी आदेशित केले होते़ मात्र विमा कंपनीकडून कृषी विभागाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या १० सप्टेंबर २०१४ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार सन २०१४-१५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील केळी व मोसंबी या फळ पिकाकरिता सहभागी शेतकऱ्यांसाठी केळी ७५ हजार तर मोसंबीसाठी ४५ हजार रुपयांचे विमा संरक्षण होते. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना सदरचे हवामान केंद्र ही चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत कृषी विमा कंपनी, शेतकरी प्रतिनिधी, कृषी अधिकारी तसेच कृषी आयुक्तालयातील अधिकारी यांच्यासमवेत ११ मे २०१७ रोजी बैठक झाली. त्यात टाटा आयजी जनरल इन्शुरन्स कंपनीला हवामान धोका कालावधीमधील नांदेड जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रावर नोंदविलेल्या हवामानाच्या आकडेवारीची सर्टिफाईड कॉपी द्यावी, २८ जून २०१६ रोजीच्या संचालकाच्या बैठकीचा पूर्तता अहवाल सादर करावा. सदोष हवामान केंद्राबाबत २०० शेतकऱ्यांनी ग्राहक मंचामार्फत नोटिसा बजावल्या, त्याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच ग्राहक मंचाने शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तत्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत आदेशित केले होते, परंतु विमा कंपनीकडून अद्यापही केळी उत्पादकांना भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे. हवामान केंद्राची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात आली असून त्या पंचनाम्यानुसार सदर केंद्र नादुरुस्त असल्याचे समोर आले होते. त्यानंतर फलोत्पादनमंत्री सदाभाऊ खोत यांनी दखल घेत स्वयंचलित हवामान केंद्र उपविभागीय स्तरावरील समितीने तपासून सद्य:स्थितीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. हा तपास एक महिन्याच्या आत पूर्ण करावा, असे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही जिल्ह्यातील हवामान केंद्राची तपासणी केलेली नाही.