शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

कृषी आयुक्तालयाच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: June 14, 2017 00:28 IST

नांदेड :विमा कंपनीकडून कृषी विभागाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केळी उत्पादकांना पीकविमा मिळण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत कृषी आयुक्तालयाकडून कृषी विमा कंपनीला नुकसान भरपाईचा अहवाल सादर करण्यासाठी आदेशित केले होते़ मात्र विमा कंपनीकडून कृषी विभागाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या १० सप्टेंबर २०१४ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार सन २०१४-१५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील केळी व मोसंबी या फळ पिकाकरिता सहभागी शेतकऱ्यांसाठी केळी ७५ हजार तर मोसंबीसाठी ४५ हजार रुपयांचे विमा संरक्षण होते. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना सदरचे हवामान केंद्र ही चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत कृषी विमा कंपनी, शेतकरी प्रतिनिधी, कृषी अधिकारी तसेच कृषी आयुक्तालयातील अधिकारी यांच्यासमवेत ११ मे २०१७ रोजी बैठक झाली. त्यात टाटा आयजी जनरल इन्शुरन्स कंपनीला हवामान धोका कालावधीमधील नांदेड जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रावर नोंदविलेल्या हवामानाच्या आकडेवारीची सर्टिफाईड कॉपी द्यावी, २८ जून २०१६ रोजीच्या संचालकाच्या बैठकीचा पूर्तता अहवाल सादर करावा. सदोष हवामान केंद्राबाबत २०० शेतकऱ्यांनी ग्राहक मंचामार्फत नोटिसा बजावल्या, त्याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच ग्राहक मंचाने शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तत्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत आदेशित केले होते, परंतु विमा कंपनीकडून अद्यापही केळी उत्पादकांना भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे. हवामान केंद्राची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात आली असून त्या पंचनाम्यानुसार सदर केंद्र नादुरुस्त असल्याचे समोर आले होते. त्यानंतर फलोत्पादनमंत्री सदाभाऊ खोत यांनी दखल घेत स्वयंचलित हवामान केंद्र उपविभागीय स्तरावरील समितीने तपासून सद्य:स्थितीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. हा तपास एक महिन्याच्या आत पूर्ण करावा, असे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही जिल्ह्यातील हवामान केंद्राची तपासणी केलेली नाही.