शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कृषी आयुक्तालयाच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: June 14, 2017 00:38 IST

नांदेड :विमा कंपनीकडून कृषी विभागाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केळी उत्पादकांना पीकविमा मिळण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत कृषी आयुक्तालयाकडून कृषी विमा कंपनीला नुकसान भरपाईचा अहवाल सादर करण्यासाठी आदेशित केले होते़ मात्र विमा कंपनीकडून कृषी विभागाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या १० सप्टेंबर २०१४ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार सन २०१४-१५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील केळी व मोसंबी या फळ पिकाकरिता सहभागी शेतकऱ्यांसाठी केळी ७५ हजार तर मोसंबीसाठी ४५ हजार रुपयांचे विमा संरक्षण होते. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना सदरचे हवामान केंद्र ही चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत कृषी विमा कंपनी, शेतकरी प्रतिनिधी, कृषी अधिकारी तसेच कृषी आयुक्तालयातील अधिकारी यांच्यासमवेत ११ मे २०१७ रोजी बैठक झाली. त्यात टाटा आयजी जनरल इन्शुरन्स कंपनीला हवामान धोका कालावधीमधील नांदेड जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रावर नोंदविलेल्या हवामानाच्या आकडेवारीची सर्टिफाईड कॉपी द्यावी, २८ जून २०१६ रोजीच्या संचालकाच्या बैठकीचा पूर्तता अहवाल सादर करावा. सदोष हवामान केंद्राबाबत २०० शेतकऱ्यांनी ग्राहक मंचामार्फत नोटिसा बजावल्या, त्याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच ग्राहक मंचाने शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तत्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत आदेशित केले होते, परंतु विमा कंपनीकडून अद्यापही केळी उत्पादकांना भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे. हवामान केंद्राची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात आली असून त्या पंचनाम्यानुसार सदर केंद्र नादुरुस्त असल्याचे समोर आले होते. त्यानंतर फलोत्पादनमंत्री सदाभाऊ खोत यांनी दखल घेत स्वयंचलित हवामान केंद्र उपविभागीय स्तरावरील समितीने तपासून सद्य:स्थितीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. हा तपास एक महिन्याच्या आत पूर्ण करावा, असे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही जिल्ह्यातील हवामान केंद्राची तपासणी केलेली नाही.