शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

कंधार ते बारूळ राज्य महामार्ग होतोय खड्डेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:34 IST

कंधार ते बारूळ या राज्य महामार्ग रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक खड्डे पडले होते. हे खड्डे चुकवताना नागरिक व ...

कंधार ते बारूळ या राज्य महामार्ग रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक खड्डे पडले होते. हे खड्डे चुकवताना नागरिक व वाहनचालकांच्या अक्षरश: नाकीनऊ आले होते. कंधार ते बारूळमार्गे जाणारा नरसी हा रस्ता राज्यमार्ग असला तरी या रस्त्यांमधून राष्ट्रीय महामार्गही जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्त्याचे काम लवकरच करणार असल्याचे आश्वासन लोहा येथे दिले होते; परंतु एक वर्षे उलटले तरी या रस्त्याच्या कामाला कुठे आडकाठी आली, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कवठा, बारूळ, काटकळंबा, हळदा, चिखली, बाचोटी, मंगल सांगवी, धर्मापुरी, चिंचोली, वरवंड, राहते, वसंतवाडी, आवळा, नंदनवन, दहीकळंबा यासह जवळपास पन्नास ते साठ गावांना तालुक्यासाठी जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो, तसेच हा रस्ता लातूर प्रवासासाठी हैदराबादला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग असून, या रस्त्यासाठी नुसते आश्वासन मागील अनेक वर्षांपासून देण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण अजूनही झाले नाही. मागील पंधरा वर्षांपासून डागडुजीचे काम होत आहे. त्यावर करोडो रुपये आतापर्यंत खर्चही झाला; परंतु सध्याच्या रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. हा रस्ता पंधरा किलोमीटरचा असला तरी त्यासाठी तब्बल दीड ते दोन तास वेळ लागत आहे.

या रस्त्याची दुरवस्था ‘लोकमत’ने नेहमीच उघड केली आहे. आताही डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. दुधावरची भूक ताकावर भागिवण्याचाच प्रकार सध्या सुरू आहे. थोडासा दिलासा आहे. तालुक्यातील राज्यमार्ग खड्डेमुक्त होत असल्याचे दिसत आहे; परंतु नागरिकांची मागणी डांबरीकरणाची आहे.