शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल पुरस्कार, लोकमतचा सततचा पाठपुरावा फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 17:35 IST

या निवडीसाठी लोकमतसह खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आदींनी पाठपुरावा केला होता.

ठळक मुद्देबुडणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून जीवाची बाजी लावून कामेश्वर याने बाहेर काढले.कामेश्वर वाघमारे याने ११ महिन्यांपूर्वी केलेल्या साहसाची दखल केंद्र सरकारने घेतली.

कंधार, जि. नांदेड: घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (घोडजकर) या बालकाने जीवाची बाजी लावत मानार नदीच्या अथांग पाण्यात बुडणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले होते. त्याच्या या धाडस, शौर्याची दखल घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या निवडीसाठी लोकमतसह खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आदींनी पाठपुरावा केला होता. घोडज, ता. कंधार येथील मनोविकास विद्यालयात शिकणारे तीन विद्यार्थी २२ फेब्रुवारी २०२० रोजी ऋषी महाराज मंदिरात दर्शनासाठी आले होते. तत्पूर्वी आंघोळीसाठी तिघे जण जवळच असलेल्या मानार नदीवरील धोबीघाटावर गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडत होते. बुडत असताना होणारा आवाज जवळ असलेल्या म. फुले माध्यमिक विद्यालय, शेकापूर, ता. कंधार येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कामेश्वर वाघमारे याच्या कानावर पडला. क्षणाचाही विलंब न करता त्याने पाण्यात उडी मारली. पाण्यात बुडत असलेल्या आदित्य दुंडे व गजानन श्रीमंगले या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून जीवाची बाजी लावून कामेश्वर याने बाहेर काढले. मात्र ओम मठपती या विद्यार्थ्याचे प्राण वाचविता आले नसल्याचे शल्य कामेश्वर याला बोचत राहिले.

तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास जाधव, व्ही.आर. राठोड, सुनील पत्रे आदींनी कौतुक करत सहकार्य केले. हा विषय हाती घेऊन पुरस्काराचा प्रस्ताव तयार करावा, यासाठी लोकमतने पाठपुरावा केला. ग्रामपंचायत घोडज, स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे यांनी निवेदनाद्वारे पुरस्कार देण्याची मागणी केली. खा. प्रताप पा. चिखलीकर यांनीही प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. आ. श्यामसुंदर शिंदे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींनी कौतुक करत प्रस्ताव सादर करण्यास संबंधितांना सांगितले. तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी जिल्हाधिकारी, महिला व बालविकास विभागाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर केला होता.कामेश्वर वाघमारे याने ११ महिन्यांपूर्वी केलेल्या साहसाची दखल केंद्र सरकारने घेतली. २२ जानेवारी २०२१ रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी त्याची निवड केली आहे. हे वृत्त धडकताच घोडजसह जिल्हाभरातून कामेश्वरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्यापेक्षा उंच व वजनाने जास्त असलेल्या २ मुलांचे प्राण वाचविणाऱ्या कामेश्वरला आर्थिक आधार देऊन उच्च शिक्षणासाठी मदतीची गरज आहे.

टॅग्स :NandedनांदेडCentral Governmentकेंद्र सरकार