शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

समतेसाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:56 IST

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य उभे केले़ जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा शिवरायांच्या विचार आणि कार्यातून मिळते़ आज सामाजिक गरजा ओळखून सर्वांनी एकत्र येवून विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्याची गरज आहे़ त्या कार्यासाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे प्रतिपादनसार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित सोहळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य उभे केले़ जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा शिवरायांच्या विचार आणि कार्यातून मिळते़ आज सामाजिक गरजा ओळखून सर्वांनी एकत्र येवून विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्याची गरज आहे़ त्या कार्यासाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़नवा मोंढा येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या मुख्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ ते म्हणाले, आज शिवरायांचा जन्मोत्सव जगभरात साजरा होतो, ही तमाम बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब आहे़ आजच्या परिस्थितीत निर्माण होणारे प्रश्न निर्माण करणारे कोण आहेत, हे ओळखून ते रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे़ शेतकरी आत्महत्या रोखणे ही सर्व समाजाची सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी पुढाकार महत्त्वाचा असल्याचे खा़चव्हाण म्हणाले़ मराठा आरक्षणासाठी काढलेल्या लाखोंच्या मोर्चानंतरही सरकारदरबारी दखल घेतली जात नाही़ ही खेदाची बाब असून मराठा समाजाला बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे खा़चव्हाण म्हणाले़ येणाºया काळात लाखोंच्या मोर्चाची दखल न घेतल्यास वेगळ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले़ मी या ठिकाणी पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही तर समाजबांधव म्हणून उपस्थित राहिलो़ यापुढेही समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सदैव आपल्यासोबत असेल, असे आश्वासन खा़ चव्हाण यांनी दिले़ दरम्यान, खा़अशोकराव चव्हाण यांनी अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त केला़आ़डी़पी़सावंत, आ़ हेमंत पाटील, डॉ़ मीनल खतगावकर आदींची समयोचित भाषणे झाली़ दरम्यान, ‘शिवचरित्रातून आम्ही काय शिकावे?’ या प्रा़ संतोष देवराये यांच्या डॉक्युमिट्रीच्या सीडीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले़सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेवून आज त्यांचा जन्मोत्सव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करीत असल्याचे सांगितले़ तसेच मराठा समाजातील मुलींसाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहाच्या पूर्णत्वासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा़ ज्यांना शक्य वेळ, पैसा, साहित्य, बौद्धिकता आदींद्वारे मदत करावी, असे आवाहन केले़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराये, रमेश पवार यांनी तर स्वागताध्यक्ष नानाराव कल्याणकर यांनी आभार मानले़