शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

गोरठ्यातील साधना केंद्र साधकांसाठी प्रेरणास्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:46 IST

श्री अनंत आठवले अर्थात ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांनी संतकवी श्री दासगणू महाराज यांच्या वस्त्र समाधीची गोरठा येथे प्रतिष्ठापना केली.

ठळक मुद्देसंतकवी दासगणू महाराजांनी केले अनेक संतांचे काव्यबद्ध चरित्रलेखनलाखाच्यावर केली काव्यरचना

बी़ व्ही़ चव्हाण ।उमरी : श्री अनंत आठवले अर्थात ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांनी संतकवी श्री दासगणू महाराज यांच्या वस्त्र समाधीची गोरठा येथे प्रतिष्ठापना केली. श्री दासगणू महाराज यांच्या व अन्य संतांच्या जीवनकार्याचा प्रसार व्हावा, त्या निमित्ताने ईश्वर भक्तीचे खरे स्वरुप लोकांसमोर असावे व साधकांसाठी येथे एक साधना केंद्र उभे रहावे, अशी या प्रतिष्ठानच्या उभारणीमागे संकल्पना आहे.प्रतिष्ठानमध्ये दररोज प्रार्थना, ध्यान, जप, पूजा, आरती, भजन व विष्णूसहस्त्रनामाचा पाठ होतो. या व्यतिरिक्त होणाऱ्या नैमित्तीक कार्यक्रमात प्रवचन, व्याख्यान, कीर्तन यातून भारतीय हिंदू संस्कृती व संवर्धन, राष्टÑभक्ती यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होत असते. विशेष म्हणजे, अत्यंत शिस्तीचे व वेळेचे पालन होणाºया या प्रतिष्ठानची सर्वत्र ख्याती आहे. मात्र याची कुठेही प्रसिद्धी होऊन यात्रेचे स्वरुप येऊ नये. प्रतिष्ठानमध्ये येणारा प्रत्येक भाविक, साधक केवळ श्रद्धाभावानेच आला पाहिजे. सात्विकतेने त्याचे आचरण केले पाहिजे, हीच त्यामागची भूमिका आहे. आजवर येथे स्वाध्याय परिवाराचे पांडुरंगशास्त्री आठवले, जयंत नारळीकर, आचार्य किशोरजी व्यास, आचार्य धमेंद्रजी, शिर्डी व शेगावचे ट्रस्टी, प्रवीण दीक्षित, धुंडा महाराज देगलूरकर, अनंत महाराज बेलगावकर, प्रसिद्ध गायक अजित कडकडे आदी अनेक मान्यवरांनी येथे भेटी दिल्या. शिर्डी येथील श्री साईबाबांचे शिष्य असलेल्या दासगणू महाराजांनी त्यांच्याच सूचनेनुसार मराठवाड्यात गोरठा येथे येवून वास्तव्य केले.येथील दानशूर आनंदीबाई गोरठेकर यांनी प्रतिष्ठानला स्वत:ची जागा दिली. यानंतर प्रत्येक धार्मिक कार्यात गोरठेकर परिवाराचा येथे सक्रिय सहभाग असतो. दासगणू महाराज हे शिर्डी संस्थानचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. शिर्डी साई मंदिरात दररोज होणारे भजन, प्रार्थना व आरत्या आदी रचना दासगणू महाराजांनी केलेल्या आहेत. दासगणू यांनी घालून दिलेल्या परंपरा आजही शिर्डी व शेगाव येथील मंदिरात आहेत. शिर्डी येथे रामनवमी उत्सवाचे तीन दिवसांचे कार्यक्रम म्हणजे दासगणू महाराजांची संकल्पना होय.सुरुवातीला दासगणू महाराज नंतर अनंत महाराज आठवले, मनू महाराज कोकलेगावकर, आता चौथ्या पिढीतील विक्रम नांदेडकर तिन्ही दिवस शिर्डी येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी असतात. सध्या शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमीच्या दिवशी काल्याचे कीर्तन विक्रम नांदेडकर हे करतात. आजही ही धार्मिक परंपरा कायम आहे.महाराष्टतील संत साहित्याचा विचार केला तर महिपतींच्या नंतर संतकवी दासगणू महाराजांनी अनेक संतांचे काव्यबद्ध चरित्रलेखन केले आहे. संतकथामृत, भक्तीलीलामृत आणि भक्ती सारामृत या तीन ग्रंथामध्ये यांचे संकलन केले आहे.काव्यनिर्मिती म्हणजे दासगणूंच्या जीवनातील एक चमत्कार होय. केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दासगणू महाराज यांनी लाखाच्यावर काव्यरचना केली. श्री गजानन महाराजांच्या ‘गजानन विजय’ या ग्रंथाने तर अनेक भाविकांच्या हृदयात अढळस्थान मिळविले.साहित्य उपलब्धमहाराष्टतील संत साहित्याचा विचार केला तर महिपतींच्या नंतर संतकवी दासगणू महाराजांनी अनेक संतांचे काव्यबद्ध चरित्रलेखन केले आहे.संतकथामृत, भक्तीलीलामृत आणि भक्ती सारामृत या तीन ग्रंथांमध्ये यांचे संकलन केले आहे. काव्यनिर्मिती म्हणजे दासगणूंच्या जीवनातील एक चमत्कार होय.केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दासगणू महाराज यांनी लाखाच्यावर काव्यरचना केली.श्री गजानन महाराजांच्या ‘गजानन विजय’ या ग्रंथाने तर अनेक भाविकांच्या हृदयात अढळस्थान मिळविले. दासगणूंचे शिष्य ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांचेही व्यापक असे साहित्य आज उपलब्ध आहे.

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळे