शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कोरोनाच्या संकटात महागाईचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

कोरोनामुळे जवळपास वर्षभरापासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या विंवचनेत अनेकांनी ...

कोरोनामुळे जवळपास वर्षभरापासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या विंवचनेत अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरू झाले होते. परिस्थिती पूर्वपदावर येत होती; परंतु आता परत एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि उत्पादन विस्कळीत झाले आहे. पर्यायाने किराणा साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.

होलसेलमध्ये पंधरा दिवसांपूर्वी तेल ११६ ते १२० रुपये किलो होते. तो दर आता तब्बल १४८ रुपयांवर गेला आहे. साखरेमागेही साधारणता तीन रुपयांची वाढ होऊन ती ३६ रुपये किलो झाली आहे. तूरडाळ ७१ ते ७५ रुपये किलो होती. ती आता होलसेलमध्ये ९३ रुपये, तर रिटेलमध्ये १२० रुपये किलोने मिळत आहे. चनाडाळ ४९ रुपयांवरून ६२ रुपये किलो झाली आहे. गूळ २ हजार ५०० रुपये क्विंटल होता. तो ३ हजार ५०० रुपये क्विंटल झाला. डालडा ३५ रुपये किलोवरून तब्बल १०० रुपये किलो झाला आहे. तांदूळमागे तब्बल २०० रुपये वाढले आहेत. शेंगदाणे १०५ रुपयांवरून १२० रुपये किलो झाले आहेत. हे सर्व भाव होलसेलचे आहेत. प्रत्यक्षात किराणा दुकानात यापेक्षा अधिक दराने विक्री करण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

घ्यायचे सामान तर घ्या

दरम्यान, शहरातील मोंढा भागातून किराणा साहित्याची होलसेलमध्ये खरेदी करण्यात येते. या ठिकाणी खरेदीसाठी गेल्यानंतर होलसेलवाले किराणाचे अव्वाच्या सव्वा दर लावत आहेत. याबाबत विचारणा केल्यास घ्यायचे तर घ्या, असा उद्धटपणे सल्ला देण्यात येतो. आम्हालाच अधिक भावाने हा माल मिळत असल्यामुळे ग्राहकांनाही तो महाग मिळतो, अशी प्रतिक्रिया किराणा विक्रेता वैजनाथ स्वामी यांनी दिली.