शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

स्वतंत्र मराठवाडा नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 16:46 IST

स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचे सांगत अशा मागणीमागे कुठलाही आधार नाही़ त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या शक्तीला आमचा कायम विरोध राहील, असे स्पष्ट मत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले़

ठळक मुद्देमराठवाडा जनता विकास परिषदेची वार्षिक बैठकअ‍ॅड़ प्रदीप देशमुख यांची मागणी चुकीची असून मराठवाडा जनता विकास परिषद अशा मागणीला कायम विरोध करील

नांदेड : स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचे सांगत अशा मागणीमागे कुठलाही आधार नाही़ त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या शक्तीला आमचा कायम विरोध राहील, असे स्पष्ट मत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले़शाखेच्या नांदेड शहर वार्षिक बैठकीत स्वतंत्र मराठवाड्याचा मुद्दा उपस्थित झाला़ जनता विकास परिषदेच्याच अ‍ॅड़प्रदीप देशमुख यांनी मध्यंतरी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली होती़ पाच दशकांत मराठवाड्याचा विकास झाला नाही़ वैधानिक विकास मंडळाचा उपायही तकलाघू असल्याचे सांगत मराठवाड्याचे स्वतंत्र अस्तित्व अपरिहार्य असल्याचे मत अ‍ॅड़देशमुख यांनी नोंदविले होते़ अ‍ॅड़देशमुख यांची ही मागणी चुकीची असल्याचे सांगत मराठवाडा जनता विकास परिषद अशा मागणीला कायम विरोध करील, असे स्पष्टीकरण परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी दिले़ माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली़ आम्ही एकसंघ व एकात्म महाराष्ट्राशी बांधील असल्याचे सांगत, स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी जे धर्मनिरपेक्ष आणि समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले होते, त्यासाठीच जनता विकास परिषदेने विविध आंदोलने केल्याचे सांगितले़या बैठकीत परिषदेचे संचालक हर्षद शहा यांनी दिल्ली-मुंबई कॉरीडॉर जालना-नांदेडमार्गे झाला पाहिजे अशी मागणी केली़ उमाकांत जोशी यांनी मराठवाड्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयावर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी झेंडावंदन अनिवार्य करावे, असे मत नोंदविले़ या बैठकीला परिषदेचे माजी केंद्रीय कोषाध्यक्ष द़मा़रेड्डी, शहर शाखेचे सरचिटणीस प्रा़डॉ़विकास सुकाळे, कोषाध्यक्ष प्राचार्य गोपाळराव कदम आदींची उपस्थिती होती़ शेवटी प्रा़अशोक सिद्धेवाड यांनी आभार मानले़रस्त्याच्या गुणवत्तेसाठी बजेटचे वॉर्डवाचन व्हावेमराठवाडा जनता विकास परिषदेच्या नांदेड शहर शाखेच्या बैठकीत विविध मुद्यांवर उपस्थितांनी मते मांडली़ प्रा़उत्तम सूर्यवंशी यांनी नांदेडच्या नियोजनबद्ध विकासासाठी महापालिका आयुक्तांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये, अशी मागणी केली़ बांधकाम गुत्तेदारांकडून रस्त्याच्या गुणवत्तेसाठी बजेटचे वॉर्डवाचन करावे, याबरोबरच दलित वस्तीसाठी मनपाचा राखीव निधी वापरताना आयुक्तांनी निकषांच्या अंमलबजावणीसाठी समिती नियुक्त करावी, अशी मागणीही सूर्यवंशी यांनी यावेळी केली़