शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सामाजिक बहिष्कार घातलेल्या पारधी कुटुंबियांचे पुनर्वसणासाठी विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 14:09 IST

नांदेड जिल्ह्यातील पिंप्री महिपाल या गावचे पारधी कुटुंब गेल्या २५ आॅक्टोबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे.

ठळक मुद्देमागील नऊ महिन्यांपासून या कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. संरक्षणासाठी पाड्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पण कोणत्याच दुकानातून यांना मिळू शकत नाही.

औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील पिंप्री महिपाल या गावचे पारधी कुटुंब  गेल्या २५ आॅक्टोबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे. या कुटुंबाच्या मागण्यांकडे प्रशासनाने अद्याप तरी लक्ष दिलेले नाही. त्यांच्या मदतीसाठी गुरुवारी कॉ. मनोहर टाकसाळ, मेजर सुखदेव बन व कॉ. बुद्धप्रिय कबीर या औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली व विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या कानावर उपोषणकर्त्यांचे म्हणणे घालावे, असा प्रयत्न केला. पण  महसूल प्रबोधिनी येथील कार्यशाळेत विभागीय आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकारी  उपस्थित असल्याने कुणाचीच भेट होऊ शकली नाही. 

पिंप्री महिपाल येथे आम्ही पिढ्यान्पिढ्या राहत आलो आहोत. गायरान जमीन कसून उपजीविका करीत आहोत. गायरान जमिनीतून उठवून लावण्यासाठी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी गावगुंडांनी आमच्या पाड्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात जीव वाचविण्यासाठी आम्ही सैरावैरा पळत सुटलो. तरीही त्यांनी आम्हाला गाठून मारहाण केली. आम्हाला गंभीर दुखापती झाल्या. हल्लेखोरांच्या या मारहाणीत शिवम जिगनू पवार हा दहा वर्षांचा मुलगा बेपत्ता आहे.  तो अद्याप सापडला नाही, अशी माहिती शीला शिंदे यांनी दिली. 

शीला शिंदे यांनी आणखी सांगितले की, जातीय द्वेषातून आमच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. संरक्षणासाठी पाड्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पण आम्हाला कोणत्याच दुकानातून माल मिळू शकत नाही. गावगुंड पोलिसांसमक्ष पाड्यावर येऊन शिवीगाळ करतात व मारहाण करतात. नांदेड पोलीस अधीक्षकांनी पारधी समाजास माणुसकीची वागणूक देण्याचा सल्ला देऊनही काहीच उपयोग झाला नाही. अशा तणावग्रस्त वातावरणात आम्ही राहायचे कसे, खायचे कसे, जगायचे कसे असा सवाल उपोषणार्थी कुटुंबाने उपस्थित केला. पीडित कुटुंबांचे सरसकट पुनर्वसन करण्यात यावे, बहिष्कार टाकणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्या केल्या.

गाव गुंडांनी घरकुले उद्ध्वस्त केली उपोषणार्थी शीला शिंदे, सुरेश पवार, दशरथ पवार व मौनाबाई पवार यांनी सांगितले की, मागील नऊ महिन्यांपासून आमच्यावर  सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. आम्हाला मिळालेली घरकुले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. आम्ही कसत असलेल्या शेतीवर गावगुंडांचा डोळा आहे. आम्हाला सळो की पळो करून सोडण्यात आल्याने आम्ही गावात जाऊ शकत नाही. न्याय मिळावा म्हणून आमची काही मंडळी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहोत तर आम्ही विभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहोत. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. महसूल प्रबोधिनी येथील कार्यशाळेत विभागीय आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकारी  उपस्थित असल्याने कुणाचीच भेट होऊ शकली नाही.