शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

योजनांची योग्य अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:30 IST

राज्य शासन सफाई कर्मचा-यांसाठीच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांची योग्य अंमलबजावणी महापालिकेने करावी असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी शुक्रवारी दिले़ महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते़

ठळक मुद्देपवार यांच्या सूचना : सफाई कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य शासन सफाई कर्मचा-यांसाठीच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांची योग्य अंमलबजावणी महापालिकेने करावी असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी शुक्रवारी दिले़ महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते़दरम्यान, सकाळी त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेतली़ यावेळी कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़ बैठकीनंतर बोलताना पवार यांनी सफाई कर्मचा-यांसाठी खूप काही करणे गरजेचे असल्याचे सांगितले़नांदेड शहराची एकूण लोकसंख्या आणि सफाई कामगारांची संख्या पाहता यात मोठी तफावत आहे़ शहराला २ हजार ५०० सफाई कामगारांची गरज असताना केवळ ६३० कर्मचारी आहेत़सफाई कामगाराला दिले जाणारे आवश्यक साहित्यही पुरवले जात नाहीत़ लाड-पागे समितीच्या शिफारशीही लागू केल्या गेल्या नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले़ सफाई कामगारांसाठीच्या घरांचा प्रश्नही रखडला आहे़ शहरात सफाई कामगारांना महापालिकेने घरे दिले नाहीत़ काही ठिकाणी जागा दिल्या असल्या तरी घरांचा प्रश्न कायम आहे़तसेच सफाई कामगारांना सुटी दिली जात नाही, अत्यावश्यक बाब असली तरी सुटीच्या दिवशीचे वेतन देणे आवश्यक आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत २५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कर्मचा-यांना आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना घरे देण्याची योजना आहे़ या योजनेचीही अंमलबजावणी शहरात झालीच नाही़ महापालिकेच्या एकूण उत्पन्नातील ५ टक्के निधी हा कर्मचा-यांवर खर्च करण्याची तरतूद असताना तो खर्च झाला नाही़ या सर्व प्रश्नांवर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे समितीचे अध्यक्ष पवार यांनी सांगितले़इतकेच नव्हे,तर तीन महिन्यानंतर योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी परत नांदेडला येण्यासही सांगितले आहे़ विविध कामगार संघटनांशीही चर्चा झाल्याचे पवार म्हणाले़समितीचा हा अहवाल शासनाला पाठविला जाणार...१० वर्षे कार्यरत नसलेली ही समिती सरकारने गतवर्षी कार्यान्वित केली असून सफाई कर्मचाºयांच्या योजनांचा आढावा घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जात असल्याचे समिती अध्यक्ष पवार यांनी सांगितले़ यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संभाजी वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते नरोत्तम चव्हाण, अ‍ॅड़ कबीर बिवाल आदींची उपस्थिती होती़