शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

राज्य महामार्गाच्या कामाने हवेत पसरले धुळीचे प्रचंड लोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:44 IST

उमरी ते लोहगाव फाटा या २५१ राज्य महामार्गावरील राहेर ते मुस्तापूर या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, सदर काम ...

उमरी ते लोहगाव फाटा या २५१ राज्य महामार्गावरील राहेर ते मुस्तापूर या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, सदर काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी करत आहे. सदरील कंपनीचे हायवा, टिप्पर, ट्रक या जड वाहनाने मोठ्या प्रमाणात मुरुम, गिट्टी, डांबरमिश्रित गिट्टीची वाहतूक रात्रंदिवस होत असल्याने व तद्वतच रस्त्याचे काम चालू असल्याने रस्त्याच्या कडेला मुरुमाचे ढीग, गिट्टीचे ढिगारे, जेसीबीने खोदत असलेले रस्ते व या मार्गावरील वाहतूक यामुळे हवेत धुळीचे प्रचंड लोट पसरत आहेत. महामार्गावरील राहेर, तोरणा, दुगाव, कुंभारगाव, बेळकोणी खुर्द, गागलेगाव, इकळीमोर, मुस्तापूर आदी गावांच्या रस्त्यानजीक असलेला तूर, हरभरा, टाळकी, टरबूज, भुईमुग, हळद, पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांवर धूळ पडून त्या पिकांवर धुळीचे थर जमा झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढीवर व उत्पादनावर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. परतीच्या पावसाने अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला असून, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके वाया गेली आहेत. त्यातच या कंपनीच्या बेजबाबदार कामाने शेतकऱ्यांचे रब्बी मोसमातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.

उपरोक्त गावातील शेतकरी मधुकर हिवराळे, माधव हिवराळे, पाटील पैलवान, विजय नरवाडे, सुरेश हिवराळे, शिवाजी नरवाडे, रावसाहेब नरवाडे, केशव पोपा, यशवंत नरवाडे, व्यंकटराव जाधव, दत्ता कदम, नागोराव कदम, मारोती साळुंखे, गोविंद शिंदे, माधवराव गंभीरे, नामदेव नरवाडे, गजानन दावरशेटीवार, माधव नरवाडे, अवधूत हिवराळे आदींसह या भागातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे व कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडे केली आहे. सदर कंपनी व शासनाकडून न्याय नाही मिळाल्यास तोरणा येथील शेतकरी सक्षम न्यायालयात दाद मागणार आहेत. रस्त्यानजीक राहेर, कुंभारगाव गावातील नागरिकांच्या आरोग्यावर या धुळीचा परिणाम होत असल्याने टँकरने सकाळ, संध्याकाळ रस्त्यावर पाणी टाकण्याची मागणी केली आहे.