शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

लाेकप्रतिनिधींना ‘गुत्तेदारी’ची भुरळ, प्रशासन ऐकणार कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. महापालिकेच्या माध्यमातून नांदेड शहर व परिसराचा संपूर्ण विकास व्हावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव ...

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. महापालिकेच्या माध्यमातून नांदेड शहर व परिसराचा संपूर्ण विकास व्हावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण सातत्याने प्रयत्नरत असतात. त्यासाठी शासनाकडून आणि वेगवेगळ्या मार्गाने शहरासाठी काेट्यवधींचा निधीही खेचून आणतात. एवढेच नव्हे तर, या निधीचा वापर करताना महापालिकाच विकास कामांची एजन्सी कशी राहील, याचाही प्राधान्याने विचार करतात. नगरसेवकांना आपल्या वाॅर्डामध्ये विकास निधी खेचून नेता यावा, हा प्रामाणिक उद्देश त्यामागे पालकमंत्र्यांचा असताे. या निधीतून दर्जेदार व दीर्घकाळ टिकणारी कामे व्हावीत, ही पालकमंत्र्यांची अपेक्षा असताना काही नगरसेवक मात्र त्यांच्या या उद्देशाला सुरुंग लावताना दिसतात. काही नगरसेवक तर चक्क गुत्तेदारीत गुंतल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. ही मंडळी कायम अर्थकारण, मार्जिन मनी व टक्केवारीच्या गणितात गुंतून राहत असल्याने साहजिकच त्यांचे वॉर्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष हाेते. या अप्रत्यक्ष गुत्तेदारीमुळेच महानगरपालिकेतील या राजकीय मंडळीला मग प्रशासन व शासकीय यंत्रणेविराेधात ताठर, टाेकाची भूमिका घेता येत नाही. जनहिताच्या नसलेल्या विषयांवरही मग या मंडळींना अर्थकारणामुळे जुळवून घ्यावे लागते. त्याचा फटका शहराच्या विकासाला व पालकमंत्र्यांच्या व्हिजनला बसताना दिसताे.

सभागृहात बाेटचेपी भूमिका

महापालिकेच्या आमसभेत अनेक नगरसेवक ताेंडही उघडत नाहीत, तर नेहमी चर्चेत राहणारी मंडळी महत्त्वाच्या मुद्द्यावर सभागृहात बघ्याची भूमिका घेताना दिसते. राेखठाेक भूमिका घेऊन प्रशासनाला, अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याची हिम्मत फारशी काेणी दाखवित नाही. महानगरपालिकेतील बहुतांश अर्थकारण ‘स्थायी’ पद्धतीने आणि ‘ग्रीन सिग्नल’च्या आधारेच चालत असल्याचे बाेलले जाते. ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय काेणत्याच फाईलीवर स्वाक्षऱ्या केल्या जात नाहीत, अशीही चर्चा ऐकायला मिळते. एकूणच लाेकप्रतिनिधी गुत्तेदाराची भूमिका वठवित असल्याने प्रशासन त्यांना जुमानणार कसे, असा मुद्दा उपस्थित हाेताे आहे.

चाैकट....

‘टक्केवारी’तच ‘इंटरेस्ट’ अधिक

अर्थात रेकाॅर्डवर कुणीही लाेकप्रतिनिधी गुत्तेदार नाेंद नाही. मात्र, विकासकामाचा गुत्तेदार ठरविताना त्यांचा पाहायला मिळणारा ‘इंटरेस्ट’च त्यांची अप्रत्यक्ष चालणारी गुत्तेदारी अधाेरेखित करते. पालकमंत्र्यांनी सत्तेत बसविलेल्या या मंडळींना वठणीवर आणून आपल्या वाॅर्डातील विकासाची जबाबदारी साेपवावी आणि त्यांना प्रत्यक्ष जनतेत पाठवावे, अशी मागणी हाेत आहे. नगरसेवकांच्या या दुर्लक्षामुळेच शहराच्या सीमावर्ती भागाला अद्याप विकासाची प्रतीक्षा आहे.