शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

बालरोगतज्ज्ञांची फौज नसताना तिसरी लाट रोखणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

नांदेड : कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे; परंतु शासकीय रुग्णालयांमध्ये मोजक्याच प्रमाणात ...

नांदेड : कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे; परंतु शासकीय रुग्णालयांमध्ये मोजक्याच प्रमाणात बालरोगतज्ज्ञ आजघडीला कार्यरत आहेत. त्यामुळे बोटावर मोजण्याएवढ्या बालरोग तज्ज्ञांच्या भरवशावर तिसरी लाट रोखणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर आयएमएच्या शंभरहून अधिक बालरोगतज्ज्ञांची गरज पडल्यास मदत घेता येणार असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत बालके अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता आहे; परंतु आजघडीला जिल्हा रुग्णालयात ३ आणि चार उपजिल्हा रुग्णालयात मिळून आठ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्या तुलनेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मात्र पूर्ण युनिट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बालरोग तज्ज्ञांची कमतरता भासणार नाही; परंतु तिसऱ्या लाटेत अधिक जण बाधित झाल्यास मात्र उपलब्ध बालरोगतज्ज्ञांवर कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आयएमएशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यापूर्वीच्या दोन लाटेत आयएमएच्या सदस्यांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा चांगल्या प्रकारे मुकाबला करण्याचा विश्वास आरोग्य यंत्रणेने वर्तविला आहे.

कोरोनाची संभाव्य लाट बालकांवर परिणाम करणारी असल्याने त्यासंदर्भाने वैद्यकीय साधनांची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे. बालकांसाठी वापरले जाणारे ऑक्सिजन सिलिंडर, मास्क, तसेच बालकांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधी मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे स्वत: या बालरोग कक्ष उभारणीकडे लक्ष देऊन आहेत. प्रशासनाला ते सूचना देत आहेत. बालकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून पालकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

ग्रामीण भागातील स्थिती वाईट

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तरुणांना अधिक घातक ठरली. त्यात आता तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येते; परंतु नांदेड जिल्ह्यात आजही ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यातही बालरोगतज्ज्ञांची वानवा आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना नांदेडलाच यावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रे असूनही नावालाच आहेत. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.