शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८५ ते ९० रेल्वे गाड्या सुरू आहेत. परंतु, त्यात एकही पॅसेंजर अथवा विनाआरक्षित रेल्वे नाही. ...

दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८५ ते ९० रेल्वे गाड्या सुरू आहेत. परंतु, त्यात एकही पॅसेंजर अथवा विनाआरक्षित रेल्वे नाही. त्यामुळे सामान्यांना हा महागडा प्रवास परवडणारा नाही. विशेष गाड्यांचा ग्रामीण भागातील जनतेला फारसा फायदा होत नाही. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करणे आवश्यक आहे.

लिंबगाव येथून परभणीला अपडाऊन करण्यासाठी रेल्वेचा उपयोग होतो. परंतु, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने नांदेडला जावे लागते. त्यापेक्षा पूर्णा मार्गे दुचाकीवरून परभणी गेलेले परवडत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्यांचा आम्हा ग्रामीण भागातील प्रवाशांना काहीही उपयोग होत नाही.

- मनोज कदम, लिंबगाव

नांदेड येथून किनवटला ये-जा करण्यासाठी रेल्वेचा प्रवास सुखकर, सोपा आणि परवडणारा आहे. परंतु, अनेक विशेष गाड्यांना या ठिकाणी थांबा नसल्याने रेल्वेसेवा सुरू असून उपयोग नाही. या मार्गावर कोरोनापूर्वी सुरू असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात, तसेच आरक्षणाची अट तत्काळ रद्द करावी.

- रावसाहेब जाधव, भोकर

तिकिटात फरक?

नांदेड येथून औरंगाबादसाठी वेगवेगळ्या गाड्यांना ७२ ते ११० रुपये तिकीट लागत होते. आज आरक्षित तिकिटाशिवाय प्रवास नसल्याने त्याच प्रवासासाठी १२० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत.

आजघडीला नांदेड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढले आहेत. संपूर्ण बाजारपेठ सुरू झाल्याने मार्केटमध्येही तुफान गर्दी हाेत आहे.

या सर्व बाबींचा विचार करता प्रवाशांची वाहतूक वाढली आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षणाची अट असल्याने बहुतांश नागरिक खासगी वाहनांसह बसला पसंती देत आहेत. त्यामुळे आरक्षणाची सक्ती बंद करून प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे.