शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८५ ते ९० रेल्वे गाड्या सुरू आहेत. परंतु, त्यात एकही पॅसेंजर अथवा विनाआरक्षित रेल्वे नाही. ...

दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८५ ते ९० रेल्वे गाड्या सुरू आहेत. परंतु, त्यात एकही पॅसेंजर अथवा विनाआरक्षित रेल्वे नाही. त्यामुळे सामान्यांना हा महागडा प्रवास परवडणारा नाही. विशेष गाड्यांचा ग्रामीण भागातील जनतेला फारसा फायदा होत नाही. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करणे आवश्यक आहे.

लिंबगाव येथून परभणीला अपडाऊन करण्यासाठी रेल्वेचा उपयोग होतो. परंतु, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने नांदेडला जावे लागते. त्यापेक्षा पूर्णा मार्गे दुचाकीवरून परभणी गेलेले परवडत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्यांचा आम्हा ग्रामीण भागातील प्रवाशांना काहीही उपयोग होत नाही.

- मनोज कदम, लिंबगाव

नांदेड येथून किनवटला ये-जा करण्यासाठी रेल्वेचा प्रवास सुखकर, सोपा आणि परवडणारा आहे. परंतु, अनेक विशेष गाड्यांना या ठिकाणी थांबा नसल्याने रेल्वेसेवा सुरू असून उपयोग नाही. या मार्गावर कोरोनापूर्वी सुरू असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात, तसेच आरक्षणाची अट तत्काळ रद्द करावी.

- रावसाहेब जाधव, भोकर

तिकिटात फरक?

नांदेड येथून औरंगाबादसाठी वेगवेगळ्या गाड्यांना ७२ ते ११० रुपये तिकीट लागत होते. आज आरक्षित तिकिटाशिवाय प्रवास नसल्याने त्याच प्रवासासाठी १२० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत.

आजघडीला नांदेड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढले आहेत. संपूर्ण बाजारपेठ सुरू झाल्याने मार्केटमध्येही तुफान गर्दी हाेत आहे.

या सर्व बाबींचा विचार करता प्रवाशांची वाहतूक वाढली आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षणाची अट असल्याने बहुतांश नागरिक खासगी वाहनांसह बसला पसंती देत आहेत. त्यामुळे आरक्षणाची सक्ती बंद करून प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे.