शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८५ ते ९० रेल्वे गाड्या सुरू आहेत. परंतु, त्यात एकही पॅसेंजर अथवा विनाआरक्षित रेल्वे नाही. ...

दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८५ ते ९० रेल्वे गाड्या सुरू आहेत. परंतु, त्यात एकही पॅसेंजर अथवा विनाआरक्षित रेल्वे नाही. त्यामुळे सामान्यांना हा महागडा प्रवास परवडणारा नाही. विशेष गाड्यांचा ग्रामीण भागातील जनतेला फारसा फायदा होत नाही. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करणे आवश्यक आहे.

लिंबगाव येथून परभणीला अपडाऊन करण्यासाठी रेल्वेचा उपयोग होतो. परंतु, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने नांदेडला जावे लागते. त्यापेक्षा पूर्णा मार्गे दुचाकीवरून परभणी गेलेले परवडत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्यांचा आम्हा ग्रामीण भागातील प्रवाशांना काहीही उपयोग होत नाही.

- मनोज कदम, लिंबगाव

नांदेड येथून किनवटला ये-जा करण्यासाठी रेल्वेचा प्रवास सुखकर, सोपा आणि परवडणारा आहे. परंतु, अनेक विशेष गाड्यांना या ठिकाणी थांबा नसल्याने रेल्वेसेवा सुरू असून उपयोग नाही. या मार्गावर कोरोनापूर्वी सुरू असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात, तसेच आरक्षणाची अट तत्काळ रद्द करावी.

- रावसाहेब जाधव, भोकर

तिकिटात फरक?

नांदेड येथून औरंगाबादसाठी वेगवेगळ्या गाड्यांना ७२ ते ११० रुपये तिकीट लागत होते. आज आरक्षित तिकिटाशिवाय प्रवास नसल्याने त्याच प्रवासासाठी १२० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत.

आजघडीला नांदेड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढले आहेत. संपूर्ण बाजारपेठ सुरू झाल्याने मार्केटमध्येही तुफान गर्दी हाेत आहे.

या सर्व बाबींचा विचार करता प्रवाशांची वाहतूक वाढली आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षणाची अट असल्याने बहुतांश नागरिक खासगी वाहनांसह बसला पसंती देत आहेत. त्यामुळे आरक्षणाची सक्ती बंद करून प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे.