शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारक सदस्यांची आधार व्हेरिफिकेशनसाठी धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:42 IST

तालुक्यात शिधापत्रिकात समाविष्ट सदस्यांची रेशन दुकानदाराकडून आधार व्हेरिफिकेशन (सत्यापन) चालू आहे. आपण आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर आपणास काही फटका बसणार का? असा दुष्काळात कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांत संभ्रम असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देस्थलांतरित कुटुंबात संभ्रम, योजनांचा लाभ न मिळण्याची भीती

कंधार : तालुक्यात शिधापत्रिकात समाविष्ट सदस्यांची रेशन दुकानदाराकडून आधार व्हेरिफिकेशन (सत्यापन) चालू आहे. आपण आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर आपणास काही फटका बसणार का? असा दुष्काळात कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांत संभ्रम असल्याचे चित्र आहे. परंतु त्यांना राज्यात कोठेही यंत्रात आधार व्हेरिफिकेशन करता येते, असे तहसीलमधील संबंधित विभागातून सांगण्यात आले.तालुक्यात ५ प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या ४५ हजार ३ अशी आहे. त्याची लोकसंख्या २ लाख २१ हजार ७७९ अशी आहे. त्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक संख्या ३ हजार ३० व लोकसंख्या १५ हजार ३७७ आहे. प्राधान्य कुटुंब योजनेचे ३२ हजार १२१ शिधापत्रिका धारक व लोकसंख्या १ लाख ६० हजार ६८६ आहे. ही सगळ्यात जास्त शिधापत्रिका व लोकसंख्या असलेली संख्या आहे.एपीएल शेतकरी शिधापत्रिका ७ हजार ८८२ आहे. याची लोकसंख्या ३७ हजार ५४३ आहे. एनपीएच केशरी ६९१ व लोकसंख्या २ हजार ४९३ आणि एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारक संख्या १ हजार २७९ असून लोकसंख्या ५ हजार ६८० आहे. एनपीएचव एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नाही. इतर शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळते.आधार काढताना नावात चुका, जन्मतारखेत चूक असेल तर दुरूस्ती करणे गरजेचे आहे. आॅनलाईनचे काम सुमारे ८० टक्के झाल्याचे समजते. मेंबर आधार व्हेरिफिकेशनचे काम १७६ दुकानात चालू आहे. रेशन दुकानात ई-पॉश मशीन आहेत. तेथे अंगठा लावणे गरजेचे आहे. येथे अंगठा मॅच होत नसेल तर आधार केंद्रात जावे लागेल. आधार व्हेरिफिकेशन केल्याने नावात दुरूस्ती होईल. शिधापत्रिका मिळतील, लाभार्थ्यांना जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास अडचण होणार नाही.१५ वर्षांखालील मुलांचे व वयोवृद्ध व्यक्तीचे आधार व्हेरिफिकेशन करताना अडचण येत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यासाठी जवळच्या आधार केंद्रात आधार अपडेट करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. सध्या रेशन बंद होणार नाही ; पण भविष्यात मात्र धोका नाकारता येत नाही. तसेच १६ हजार २० जणांचे आधार नोंदविणे शिल्लक आहे. त्यांना आता ईकेवायसीच्या माध्यमातून नोंदणी करता येते. आता या संधीचा फायदा संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार संतोषी देवकुळे यांनी केले आहे.तालुक्यात दुष्काळ असल्याने अनेक कुटुंबातील सदस्य पाल्याच्या शिक्षण, विवाह, रोजीरोटीसाठी वीटकाम, बांधकाम, ऊसतोडणीसाठी तात्पुरते स्थलांतरित झाले आहेत. गावाकडून आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी अशा सदस्यांना भ्रमणध्वनी केले जात आहेत. लांब असलेल्या सदस्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. राज्यात कोठेही आधार व्हेरिफिकेशन करता येते.

टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्न