शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

सर्वांसाठी घरकुले योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:30 IST

शहरात वर्षभरापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज भरुन घेण्यात आले असले तरी वर्षभरात शहरात एकाही घराचे काम पूर्ण झाले नाही. उलट महापालिकेकडून या योनजेअंतर्गत पाठविलेल्या ४ विकास आराखड्यांना फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे ‘सर्वांसाठी घरे’ ही घोषणा प्रत्यक्षात कधी अंमलात येईल, याकडे लाभार्थी आशाळभूत नजरेने डोळे लावून आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान आवास : १ हजार ८१७ जणांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात वर्षभरापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज भरुन घेण्यात आले असले तरी वर्षभरात शहरात एकाही घराचे काम पूर्ण झाले नाही. उलट महापालिकेकडून या योनजेअंतर्गत पाठविलेल्या ४ विकास आराखड्यांना फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे ‘सर्वांसाठी घरे’ ही घोषणा प्रत्यक्षात कधी अंमलात येईल, याकडे लाभार्थी आशाळभूत नजरेने डोळे लावून आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गतवर्षी सर्वासाठी घरे या अंतर्गत महापालिकेने घरांसाठी अर्ज भरुन घेतले. महापालिकेने ३ सप्टेंबर २०१६ पर्यंत घरकुलांसाठी अर्ज भरुन घेतले होते. त्यामध्ये ५१ हजार ७६ अर्ज आॅनलाईन आले होते. अर्ज भरण्याची स्थानिक मुदत संपली असली तरी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अजूनही अर्ज भरता येत आहेत. या संकेतस्थळवर नांदेडमधील १ हजार ८९७ अर्ज भरण्यात आले आहेत.ही योजना तीन प्रकारांमध्ये राबविली जाणार आहे. लाभार्थ्यांना घरकुलांसाठी कर्ज स्वरुपात रक्कमही देण्यात येणार आहे. अशा ७ हजार ६६ लाभार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. खाजगी भागिदारी तत्वावरील शहरातील भाडेकरुसाठी घर मिळणार आहे. असे २० हजार २७९ आणि स्वत: बांधकाम करण्यास तयार असलेल्या लाभार्थ्यांचेही २३ हजार ७२७ अर्ज प्राप्त झाल आहेत.या प्राप्त अर्जानंतर महापालिकेने शहरात जवळपास ७० टक्के सर्वेक्षण पूर्ण केले आहे.नांदेड महापालिकेने या योजनेअंतर्गत शासनाकडे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार वेळा विकास आराखडा पाठविला होता. चारही वेळा तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने आता विकास आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी सल्लागार संस्थांचे अर्ज मागविले आहेत. आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यातून आता संस्थेची निवड केली जाईल. या संस्थेमार्फत आता पुन्हा एकदा नव्याने विकास आराखडा शासनाला पाठविला जाणार आहे.महापालिकेच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरात जवळपास ५३ हजार अर्ज आले असले तरी २०२२ पर्यंत राबविण्यात येणाºया या योजनेला नांदेडमध्ये २०१७ साल संपत आले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवातच झाली नाही. हे काम कधी सुरु होईल, याकडे लक्ष लागले आहे.