शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मेगा अ‍ॅग्रोच्या प्रकरणात आता १३ आॅगस्टला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:29 IST

कृष्णूरच्या इंडिया मेगा अ‍ॅग्रो कंपनीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या ठिकाणचे १५ युनिट बंद करण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी उच्च न्यायालयात कारवाईदरम्यान फक्त फ्लोअर मिल सील करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे़ त्यामुळे कंपनीचे १४ युनिट आता सुरु होणार आहेत़ कंपनी बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेच आदेश दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले असून या प्रकरणात आता १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे़

ठळक मुद्दे१४ युनिट होणार सुरु : एकच युनिट बंद केल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूरच्या इंडिया मेगा अ‍ॅग्रो कंपनीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या ठिकाणचे १५ युनिट बंद करण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी उच्च न्यायालयात कारवाईदरम्यान फक्त फ्लोअर मिल सील करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे़ त्यामुळे कंपनीचे १४ युनिट आता सुरु होणार आहेत़ कंपनी बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेच आदेश दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले असून या प्रकरणात आता १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे़१७ जुलै रोजी पोलिसांनी कृष्णूरच्या इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीवर धाड मारली होती़ या ठिकाणाहून पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्याचे आठ ट्रक पकडले होते़ या प्रकरणात कंपनीच्या संचालकासह इतरांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ यावेळी पोलिसांनी कंपनीचे सर्वच्या सर्व पंधरा युनिट बंद केल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आला होता़ त्यानंतर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली़न्यायालयात सुनावणी दरम्यान नांदेड पोलिसांनी सर्वच्या सर्व युनिट बंद केले नसून फक्त फ्लोअर मिल बंद केले आहे, असे स्पष्ट केले़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १० आॅगस्टच्या पत्रानुसार कंपनी बंद करण्याबाबत कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे़ याबाबत आता १३ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़दरम्यान, पोलीस कारवाईच्या धास्तीने मेगा अ‍ॅग्रो अनाज लिमिटेड कृष्णूर येथील कामगारांनी परराज्यात पलायन केले आहे़ कारखान्याचे व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया यांचा जामीन फेटाळला आहे़ तापडियावर गुन्हा दाखल झाला आहे़ त्यात युनिट बंद असून चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी या ठिकाणच्या अनेक परप्रांतीय कामगारांनी पलायन केले आहे़ त्यात आता कंपनीचे १४ युनिट सुरु होणार असल्याची माहिती आहे़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयfraudधोकेबाजी