शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सलाईनवर असलेली आरोग्य यंत्रणा झाली ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

नांदेड : अर्थसंकल्पात दरवर्षी आरोग्य या विषयाला दुय्यम स्थान दिले जाते. त्यासाठी ठेवण्यात येणारा निधीही तुटपूंजाच असतो. त्यामुळे राज्यातील ...

नांदेड : अर्थसंकल्पात दरवर्षी आरोग्य या विषयाला दुय्यम स्थान दिले जाते. त्यासाठी ठेवण्यात येणारा निधीही तुटपूंजाच असतो. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कमकुवत झाली आहे. त्यातच कोरोनासारख्या महामारीने नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कमकुवतपणा चव्हाट्यावर आणला होता. परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने उचललेल्या पावलांमुळे सलाईनवर असलेली आरोग्य यंत्रणा आता ठणठणीत झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे का होईना, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने कात टाकली आहे. नांदेडमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, आयुर्वेदिक रुग्णालय यासह ग्रामीण भागात रुग्णालयांची मोठी साखळी आहे. परंतु, कोरोनाच्या संकटात पहिल्या टप्प्यातच या सर्व आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णांना खाटा, इंजेक्शन मिळणेही अवघड झाले होते. सगळीकडेच गोंधळाचे वातावरण होते. परंतु, प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. जिल्हाधिकारी विपीन ईटणकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. अजितपालसिंग संधू, डॉ. वाय. एच. चव्हाण यांच्यासह असंख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र एक करुन यंत्रणा उभी केली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही गरज पडली त्यावेळेस निधी उपलब्ध करुन देणे असो किंवा ऑक्सिजन, इंजेक्शन यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले. कोरोना काळातच वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक उभे राहिले. दोनशे खाटांचे रुग्णालय कार्यान्वित झाले. अतिरिक्त खाटा, व्हेंटिलेटर यासह इतर यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणात मिळाली. त्याचबरोबर रिक्त असलेल्या जागांवर भरतीही करण्यात आली. कोरोना काळात यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमांमुळेच आजघडीला रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. कोरोनामुुळे खऱ्या अर्थाने नांदेडमधील आरोग्य यंत्रणेने कात टाकली आहे.