शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

मुलांमुलींसाठी स्वतंत्र अपंग शाळा

By admin | Updated: January 28, 2015 14:06 IST

मुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अनुराग पोवळे /नांदेडमुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात तसेच मुली असलेल्या निवासी शाळेत कंत्राटी तत्वावर तरी महिला अधीक्षक नेमाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे उपायुक्त माधव वैद्य यांनी दिली.नायगाव तालुक्यातील नरसी येथील जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव पीर ता. मुखेड संचलित निवासी मूकबधीर शाळेत घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर २७ जानेवारी रोजी उपायुक्त माधव वैद्य यांनी त्या शाळेस भेट दिली. तसेच त्यांनी पीडित मुलीची बिलोली येथे जावून भेट घेतली. यावेळी वैद्य यांनी शाळेतील परिस्थितीची माहिती घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांचीही उपस्थिती होती. शाळेतीलच तीन शिपाई असलेल्या कर्मचार्‍यांविरूद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचीही त्यांनी भेट घेवून घटनेची माहिती घेतली. या भेटीनंतर लोकमतशी बोलताना वैद्य यांनी सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याने या निवासी मूकबधीर शाळेची मान्यता काढून घेण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याचे सांगितले. तसेच पीडित मुलगी मागासवर्गीय असल्याने अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मुलीला समाजकल्याण विभागाकडून तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत देण्याचाही प्रस्ताव असल्याचे सांगितले. दुसरीकडे निवासी अपंग शाळेतील मुलींच्या शोषणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. या गंभीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी आता निवासी स्वरूपात असलेल्या या शाळा मुले आणि मुलींसाठी स्वतंत्ररित्या चालवाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. लातूर विभागांतर्गत आजघडीला जवळपास ३५0 निवासी शाळा आहेत. त्यात ६२ शाळा नांदेड जिल्ह्यात आहेत. या निवासी अपंग शाळांमध्ये मूकबधीर, मतीमंद, अपंग, अंध शाळांचा समावेश आहे. ज्या शाळांमध्ये मुलीं आहेत त्या शाळांवर निवासी महिला अधीक्षक नेमणुकीचा प्रश्नही महत्वाचा आहे. त्यामुळे अशा शाळांवर कंत्राटी स्वरूपात तरी महिला अधीक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैद्य म्हणाले.दरम्यान, या प्रकरणात समाजकल्याण विभागाने विनयभंगाचे गुन्हे दाखल झालेल्या शाळेतील शिपाई चंद्रकांत बरमे, मुजीब शहाजीर आणि देवीदास तिपले यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे समाजकल्याण अधिकारी खमीतकर यांनी सांगितले.

 ■ नरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयाची मान्यता काढण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने शासनाकडे पाठविला आहे. या शाळेत एकूण ४0 विद्यार्थ्यांची मान्यता आहे. प्रत्यक्षात शाळेत आजघडीला एकूण ५४ विद्यार्थी आहेत. त्यात २५ मुली आहेत. मान्यता काढल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी इतर शाळेत हलविण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैद्य यांनी सांगितले. त्यामुळे शासनाकडून या शाळेवर कारवाई होईल हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील कलम वाढवावेत अशी मागणी होत आहेत.