शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मुलांमुलींसाठी स्वतंत्र अपंग शाळा

By admin | Updated: January 28, 2015 14:06 IST

मुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अनुराग पोवळे /नांदेडमुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात तसेच मुली असलेल्या निवासी शाळेत कंत्राटी तत्वावर तरी महिला अधीक्षक नेमाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे उपायुक्त माधव वैद्य यांनी दिली.नायगाव तालुक्यातील नरसी येथील जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव पीर ता. मुखेड संचलित निवासी मूकबधीर शाळेत घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर २७ जानेवारी रोजी उपायुक्त माधव वैद्य यांनी त्या शाळेस भेट दिली. तसेच त्यांनी पीडित मुलीची बिलोली येथे जावून भेट घेतली. यावेळी वैद्य यांनी शाळेतील परिस्थितीची माहिती घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांचीही उपस्थिती होती. शाळेतीलच तीन शिपाई असलेल्या कर्मचार्‍यांविरूद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचीही त्यांनी भेट घेवून घटनेची माहिती घेतली. या भेटीनंतर लोकमतशी बोलताना वैद्य यांनी सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याने या निवासी मूकबधीर शाळेची मान्यता काढून घेण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याचे सांगितले. तसेच पीडित मुलगी मागासवर्गीय असल्याने अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मुलीला समाजकल्याण विभागाकडून तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत देण्याचाही प्रस्ताव असल्याचे सांगितले. दुसरीकडे निवासी अपंग शाळेतील मुलींच्या शोषणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. या गंभीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी आता निवासी स्वरूपात असलेल्या या शाळा मुले आणि मुलींसाठी स्वतंत्ररित्या चालवाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. लातूर विभागांतर्गत आजघडीला जवळपास ३५0 निवासी शाळा आहेत. त्यात ६२ शाळा नांदेड जिल्ह्यात आहेत. या निवासी अपंग शाळांमध्ये मूकबधीर, मतीमंद, अपंग, अंध शाळांचा समावेश आहे. ज्या शाळांमध्ये मुलीं आहेत त्या शाळांवर निवासी महिला अधीक्षक नेमणुकीचा प्रश्नही महत्वाचा आहे. त्यामुळे अशा शाळांवर कंत्राटी स्वरूपात तरी महिला अधीक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैद्य म्हणाले.दरम्यान, या प्रकरणात समाजकल्याण विभागाने विनयभंगाचे गुन्हे दाखल झालेल्या शाळेतील शिपाई चंद्रकांत बरमे, मुजीब शहाजीर आणि देवीदास तिपले यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे समाजकल्याण अधिकारी खमीतकर यांनी सांगितले.

 ■ नरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयाची मान्यता काढण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने शासनाकडे पाठविला आहे. या शाळेत एकूण ४0 विद्यार्थ्यांची मान्यता आहे. प्रत्यक्षात शाळेत आजघडीला एकूण ५४ विद्यार्थी आहेत. त्यात २५ मुली आहेत. मान्यता काढल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी इतर शाळेत हलविण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैद्य यांनी सांगितले. त्यामुळे शासनाकडून या शाळेवर कारवाई होईल हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील कलम वाढवावेत अशी मागणी होत आहेत.