शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वीजपुरवठा नसलेल्या ग्रामपंचायती ऑनलाईन!

By admin | Updated: January 27, 2015 12:31 IST

ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करुन संगणक पुरवठा करण्यात आला असून वीजपुरवठाच नसलेल्या ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश आहे हे विशेष

 नांदेड : कामात पारदर्शकता, तत्परता यावी म्हणून शासनाने संग्राम कक्षाची स्थापना केली. त्याअंतर्गत ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करुन संगणक पुरवठा करण्यात आला. आतापर्यंत त्यावर तब्बल २३ कोटी २९ लाखांच्या खर्चाचा उजेड पाडला असून वीजपुरवठाच नसलेल्या ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश आहे हे विशेष.ग्रामपंचायतीच्या कारभारांमध्ये सुसूत्रता यावी या दृष्टीने संग्राम योजनेअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी संगणक वाटप करण्यात आले. या कक्षाअंतर्गत विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे काढणे सोयीचे झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १३0९ ग्रामपंचायतींना संगणक पुरवठा करण्यात आला. ई-पंचायत प्रकरणाच्या अंमलबजावणीसाठी महाऑनलाईन (महाराष्ट्र शासन टाटा कन्सलटन्सी यांची सहभागीदार कंपनी) या यंत्रणेची नेमणूक करण्यात आली. परंतु त्यासाठी या महाऑनलाईनसोबत कुठलाही करारनामा करण्यात आला नाही. त्यामुळे ही कंपनी अधिकृत की, अनधिकृत? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यात १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील १३0९ ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले. परंतु यापैकी किती ग्रामपंचायतीमध्ये वीजपुरवठा आहे किंवा नाही याची माहितीही पंचायत विभागाकडे नाही. असे असताना पंचायत विभाग मात्र आतापर्यंत २३ कोटी २९ लाख ९७ हजार रुपये खर्च केल्याचे सांगत आहे. त्यामुळे या खर्चाचा उजेड नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पडला अन् तिथे संगणक कार्यान्वित झाले हे गुलदस्त्यातच आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते मोतीराम काळे यांनी पाठपुरावा केला. परंतु त्यांनाही फक्त चार तालुक्यांचीच अन् तीही अर्धवट माहिती देण्यात आली. /(प्रतिनिधी) ■ अर्धापूर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींमध्ये वीजपुरवठा नाही.४/ बिलोलीमध्ये १६, उमरी-९ ग्रामंपचायतीमध्ये वीजपुरवठाच नसल्याचे तर धर्माबाद तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये वीजपुरवठा असल्याचे पंचायत विभागाचे म्हणणे आहे. > त्यामुळे वीजपुरवठा नसलेल्या ग्रामपंचायतीवरही पंचायत विभागाने कसा खर्च केला? हा संशोधनाचा विषय आहे. त्याचबरोबर त्रिपक्षीय करारनाम्याची स्पष्टताही पंचायत विभागाने अद्याप केली नाही. > या प्रकरणात मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही काळे यांनी केली.