शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
3
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
4
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
5
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
6
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
7
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
8
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
9
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
10
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
11
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
12
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
13
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
14
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
15
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
16
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
17
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
18
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
19
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
20
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा

सहा पालिकांच्या घनकचरा प्रकल्पास शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:29 IST

नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता केंद्र शासनाच्या पुढाकाराने देशातील शहरी व नागरी भागात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालिकेच्या वतीने उभारावयाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान : नगरविकास विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता केंद्र शासनाच्या पुढाकाराने देशातील शहरी व नागरी भागात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालिकेच्या वतीने उभारावयाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा समावेश आहे.‘स्वच्छ महाराष्टÑ’ अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील ३७ शहरांचे नागरी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे अहवाल महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने तांत्रीक मान्यता देवून ‘निरी’ या संस्थेने सदर प्रकल्पाचे मूल्यांकन केले आहे. त्यानंतर हे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील ३७ शहरांच्या १८३.४६०१ कोटी रूपये किंमतीच्या नागरी,घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, हदगाव, कंधार, किनवट, लोहा आणि उमरी या सहा नगर परिषदांचा समावेश आहे.या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी दोन टप्प्यात या पालिकांना वितरीत करण्यात येणार असून सदर प्रकल्पासाठी वितरीत केलेला निधी त्याच प्रकल्पासाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निधीचा वापर इतर कामासाठी केल्यास ही गंभीर अनियमीतता समजण्यात येईल, असा इशाराही या प्रकल्पांना मान्यता देताना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिला आहे. याबरोबरच पालिकांनी एप्रिल २०१८ पर्यंत शहरात दररोज निर्माण होणाºया घनकचºयापैकी किमान ९० टक्के घनकचरा निर्मीतीच्या जागीच विलगीकरण करून संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.ओल्याची खतनिर्मीती, सुक्या कचºयाचा पुर्नवापरजिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देताना या घनकचºयाचे निर्मीतीच्या जागी १०० टक्के विलगीकरण करण्यास सांगितले आहे. या विलगीकरण केलेल्या कचºयाची वाहतूकही विलगीकृत पद्धतीने करावयाची असून ओल्या कचºयापासून कंपोस्टखत निर्मीती करावी. या खताची प्रयोग शाळेतून तपासणी करून घेवून त्यास हरित महासिटी कंपोस्ट हा ब्रॅण्ड मिळवावा. तर सुक्या कचºयाचे पदार्थ पुर्नप्राप्ती सुविधा केंद्रांवर विलगीकरण करावे यातील पुर्नवापर होणाºया सुक्या कचºयाचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत.या सहा पालिकांना मिळणार निधी‘स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत’ मुदखेड नगर परिषदेच्या नागरी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. मुदखेड पालिकेच्या या प्रकल्पाची मंजुरी किंमत १७०.०५६४ लक्ष एवढी आहे. हदगाव पालिकेच्या प्रकल्पाची मंजुरी किंमत २१९.२७०९ लक्ष एवढी, कंधार- २०७.६१८६ लक्ष, किनवट - २२२.३९०३ लक्ष, लोहा- १८९.९९७७ लक्ष तर उमरी नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची मंजुरी किंमत १३२.४७९५ लक्ष एवढी आहे. या प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीसाठी आवश्यक यंत्रणा संबंधीत पालिकांनी उभा करावयाच्या असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.