शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

सहा पालिकांच्या घनकचरा प्रकल्पास शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:29 IST

नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता केंद्र शासनाच्या पुढाकाराने देशातील शहरी व नागरी भागात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालिकेच्या वतीने उभारावयाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान : नगरविकास विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता केंद्र शासनाच्या पुढाकाराने देशातील शहरी व नागरी भागात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालिकेच्या वतीने उभारावयाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा समावेश आहे.‘स्वच्छ महाराष्टÑ’ अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील ३७ शहरांचे नागरी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे अहवाल महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने तांत्रीक मान्यता देवून ‘निरी’ या संस्थेने सदर प्रकल्पाचे मूल्यांकन केले आहे. त्यानंतर हे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील ३७ शहरांच्या १८३.४६०१ कोटी रूपये किंमतीच्या नागरी,घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, हदगाव, कंधार, किनवट, लोहा आणि उमरी या सहा नगर परिषदांचा समावेश आहे.या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी दोन टप्प्यात या पालिकांना वितरीत करण्यात येणार असून सदर प्रकल्पासाठी वितरीत केलेला निधी त्याच प्रकल्पासाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निधीचा वापर इतर कामासाठी केल्यास ही गंभीर अनियमीतता समजण्यात येईल, असा इशाराही या प्रकल्पांना मान्यता देताना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिला आहे. याबरोबरच पालिकांनी एप्रिल २०१८ पर्यंत शहरात दररोज निर्माण होणाºया घनकचºयापैकी किमान ९० टक्के घनकचरा निर्मीतीच्या जागीच विलगीकरण करून संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.ओल्याची खतनिर्मीती, सुक्या कचºयाचा पुर्नवापरजिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता देताना या घनकचºयाचे निर्मीतीच्या जागी १०० टक्के विलगीकरण करण्यास सांगितले आहे. या विलगीकरण केलेल्या कचºयाची वाहतूकही विलगीकृत पद्धतीने करावयाची असून ओल्या कचºयापासून कंपोस्टखत निर्मीती करावी. या खताची प्रयोग शाळेतून तपासणी करून घेवून त्यास हरित महासिटी कंपोस्ट हा ब्रॅण्ड मिळवावा. तर सुक्या कचºयाचे पदार्थ पुर्नप्राप्ती सुविधा केंद्रांवर विलगीकरण करावे यातील पुर्नवापर होणाºया सुक्या कचºयाचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत.या सहा पालिकांना मिळणार निधी‘स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत’ मुदखेड नगर परिषदेच्या नागरी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. मुदखेड पालिकेच्या या प्रकल्पाची मंजुरी किंमत १७०.०५६४ लक्ष एवढी आहे. हदगाव पालिकेच्या प्रकल्पाची मंजुरी किंमत २१९.२७०९ लक्ष एवढी, कंधार- २०७.६१८६ लक्ष, किनवट - २२२.३९०३ लक्ष, लोहा- १८९.९९७७ लक्ष तर उमरी नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची मंजुरी किंमत १३२.४७९५ लक्ष एवढी आहे. या प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीसाठी आवश्यक यंत्रणा संबंधीत पालिकांनी उभा करावयाच्या असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.