शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:13 IST

उन्हाळ्याची चाहूल लागली असून किनवट तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील मौजे धानोरा येथील पाणीसाठे कोरडेठाक पडल्यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे़ त्यात उपविभागीय अधिका-यांनी टँकर सुरु करण्याला मंजुरी देवूनही टँकर सुरु करण्यात आले नाही़ या विरोधात धानोरा येथील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरमोर्चा काढला़

ठळक मुद्देआंदोलन यशस्वी : धानोरा (सी) येथे टँकर सुरू करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्हाळ्याची चाहूल लागली असून किनवट तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील मौजे धानोरा येथील पाणीसाठे कोरडेठाक पडल्यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे़ त्यात उपविभागीय अधिका-यांनी टँकर सुरु करण्याला मंजुरी देवूनही टँकर सुरु करण्यात आले नाही़ या विरोधात धानोरा येथील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरमोर्चा काढला़किनवट तालुक्यातील मौजे धानोरा येथे दोन विहिरी आणि दोन हातपंप आहेत़ परंतु ते कोरडेठाक पडले आहेत़ पाण्याची गावात पर्यायी व्यवस्थाच नसल्यामुळे गावात टँकर सुरु करण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला़तहसीलदारांनी २ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकाºयांकडे हा प्रस्ताव पाठविला़ उपविभागीय अधिकाºयांनी ६ फेब्रुवारी रोजी तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला, परंतु त्यानंतरही या गावात टँकर सुरु करण्यात आले नाही़ त्यामुळे पाण्यासाठी धानोरा येथील महिलांनी नांदेड गाठले़ डोक्यावर घागरी घेवून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन सुरु केले़ त्यानंतर या संतप्त ग्रामस्थांनी आपला मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळवला. जिल्हा परिषदेत कार्यालयात जाणारा रस्ता त्यांनी रोखून धरला. संतप्त महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली़ आंदोलनात सरपंच निलेश कुमरे, रत्नमाला कुमरे, महादेवी मठपती, अश्विनी सोनुले, राधाबाई शिंदे, कल्पना तोडसाम, तानूबाई आत्राम, अर्चना कुमरे, गिता कुमरे, सोनू कुडमते, सोमित्राबाई कुठमते, ज्योत्स्ना आत्राम, संध्या नप्ते, सुलोचना कुमरे आदींचा समावेश होता़