शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान हे माणूसकेंद्रित - डॉ. यशवंत मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST

अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ...

अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बनसोड, डॉ. प्रकाश खरात, डॉ. वंदना महाजन, भदंत पंय्याबोधी थेरो तसेच संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे आणि डॉ. जे.टी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मनोहर म्हणाले की, बुद्ध हा जगातील पहिला शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी सत्याला शोधून काढलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या धम्माची पुनर्रचना केली आणि जगमान्य झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्माची पुनर्रचना वैज्ञानिक सत्यावर आधारित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आता बुद्धासारखे विश्वमय होत आहेत. बुद्ध हा जगाचा पहिला तत्त्वज्ञानी आहे.

माणसांनी ईश्वराशी कसे वागावे ही नैतिकता नव्हे. ती निरर्थकता आहे. तर माणसांनी माणसांशी कसं वागावं हीच खरी नैतिकता आहे. भौतिकवादाला नैतिकवाद व नैतिकवादाला भौतिकवाद करणारं हे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. चैतन्यवादी तत्त्वज्ञानातील फोलपणा बुद्धाने अधोरेखित केला. बुद्धाचं तत्त्वज्ञान निरीश्वरवादी आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान हे अंतिम सत्याचा शाेध घेणारे आहे. आपण जे शोधलं ते नवं तत्त्वज्ञान परंपरेच्या जोखडाखाली जगणारे लोक स्वीकारतील काय? बुद्धाच्या मनात ‘विषाद’दाटून आला. लोकांना सांगू की नको, असा प्रश्न बुद्धासही पडला. पण हे सर्वसमान्यांच्या हिताचं तत्त्वज्ञान लोकांना सांगितलंच पाहिजे, या निष्कर्षाप्रत पोहोचून बुद्धाने जगाचा उद्धार केला, असे डाॅ. मनोहर म्हणाले. यशस्वीतेसाठी अरविंद निकोसे, सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे, देवानंद सुटे यांनी परिश्रम घेतले.