शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

सुशिक्षित तरुणांना गंडविणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST

पंढीत ढवळे यांनी वसमत पोलीस ठाण्यात १३ मे २०२१ रोजी संतोष बनवारीलाल सरोज, रा. बाडेपूर, जि. जोनपूर याच्या विरोधात ...

पंढीत ढवळे यांनी वसमत पोलीस ठाण्यात १३ मे २०२१ रोजी संतोष बनवारीलाल सरोज, रा. बाडेपूर, जि. जोनपूर याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यात ढवळे यांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत सरोज याने दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे नमूद केले होते, तसेच आरोपींनी अशाच प्रकारे अनेकांना गंडविल्याचेही ढवळे यांनी पोलिसांना सांगितले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक यतीश देशमुख यांनी दोन पथके तयार केली. स्थागुशाचे पोउपनि शिवसांब घेवारे, पोशि. किशाेर कातकडे, विठ्ठल काळे, जयप्रकाश झाडे व वसमतचे सपोनि बोधनापोड, संदीप चव्हाण, रवी ठेंबरे, विवेक गुंडरे, बालाजी वडगावे यांचा त्यात समावेश हाेता. पोलिसांनी ९ जून रोजी नांदेड रेल्वेस्टेशन परिसरातून रवींद्र दयानिधी संकुवा, रा.ओडिशा, ॲड. नरेंद्र विष्णुदेव प्रसाद रा. लयरोपरुवार, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत या प्रकरणाची व्याप्ती देशभरात असल्याचे लक्षात आले. आरोपींनी नांदेड, मुंबई, दिल्ली व लखनौ यासह अनेक ठिकाणी तरुणांना बोगस नियुक्तीपत्रे दिली होती. सायबर सेलच्या माध्यमातून ११ जून रोजी नांदेड शहरातून सतीश तुळशीराम हंकारे, रा.बोरगाव, ता.लोहा, आनंद पांडुरंग कांबळे, रा.अहमदपूर यांना अटक केली. हे दोन्ही आरोपी नांदेडला पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांना हेरत होते. १३ जून रोजी पोलिसांनी मुंबई येथून गौतम एकनाथ फणसे याला अटक केली. त्याने मुंबईत अनेकांना गंडविल्याची कबुली दिली. दिल्ली येथून अभय मेघ:श्याम रेडकर याला पकडले. त्याच्याकडून संतोष कुमार सरोजची माहिती मिळाली. लखनौ येथे लपून बसलेल्या सरोजला एका लॉजमधून अटक केली. त्याच्याकडून मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नावे बनावट स्टॅम्प, नियुक्तीपत्र, भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार यांची नावे असलेले लिफाफे, बनावट ओळखपत्र यासह इतर साहित्य मिळाले. पोलिसांनी आरोपींची १८ बँक खाती सील केली आहेत. नगदी ५६ हजार, कार, सात मोबाइल, असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दहा वर्षांपासून चालवीत होते रॅकेट

आरोपी हे गेल्या दहा वर्षांपासून हे रॅकेट चालवीत होते. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यांतील बेरोजगार तरुणांची त्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.