शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

झळकवाडीत चारशे कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:15 IST

नांदेड : किनवट आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडी या गावामध्ये चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मृत ...

नांदेड : किनवट आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडी या गावामध्ये चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मृत कोंबड्या गावाच्या जवळच टाकल्याने त्याची गावाभोवती दुर्गंधी पसरली असून, या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात बर्ड फ्ल्यू आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने शहरी व गाव पातळीवर काम करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला अलर्ट राहण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या गावांमध्ये कुठलाही पशुसंवर्धन विभागाचा अधिकारी किंवा साधा कर्मचारीही फिरकला नाही. त्यामुळे या गावात कोंबड्यांची मृत्युसंख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून, दिवसाकाठी कोंबड्यांचे मृत्यू वाढतच आहेत. त्यामुळे मृत्यू पडलेल्या कोंबड्या गावाच्या शेजारी रोडच्या कडेला फेकून दिल्याने मरण पावलेल्या कोंबड्यांमध्ये आळ्या लागून गावाभोवती अशी दुर्गंधी पसरली आहे. जवळपास या गावातील चारशे कोंबड्याचा मृत्यू झाल्याची माहिती येथील नागरिक व सरपंच दामाजी तांबारे यांनी दिली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हिमायतनगर तालुक्यात शंभरहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, अनेक तालुक्यातील कोंबड्या आणि कावळ्याचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.