शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर; पॉझिटिव्हच्या संपर्कातील पाच जणांचीही चाचणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST

नांदेड : नांदेड शहर व परिसरात कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू झाला असून रुग्णमृत्युचे प्रमाणही वाढत आहे. एका दिवसात तब्बल ...

नांदेड : नांदेड शहर व परिसरात कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू झाला असून रुग्णमृत्युचे प्रमाणही वाढत आहे. एका दिवसात तब्बल २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील केवळ पाच जणांचीही तपासणी केली जात नाही. त्यामुळेच संसर्ग वाढून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.

नांदेड जिल्ह्यात अचानक हजारांवर रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासनाने ठिकठिकाणी चाचणी करण्यासाठी कोरोना तपासणी केंद्रे उभारली आहेत. शहरात जवळपास १५ ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यातून होणाऱ्या तपासण्यात दररोज एक हजार ते दीड हजार रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील किमान पाच जणांची तरी तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु, आरोग्य विभागाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचाच विसर पडल्याचे दिसत आहे. त्यात गृहविलगीकरणाची मुभा रद्द केल्याने कोणीही संशयित तपासणीसाठी पुढे यायला तयार नाही. त्याचबरोबर मेडिकलवर जाऊन सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीच्या गोळ्या-औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बहुतांश मेडिकलवर नेहमीपेक्षा आजघडीला गर्दी अधिक पहायला मिळत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केली नाही तर रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दररोज हजार पॉझिटिव्ह; चाचण्या मात्र साडेचार हजारांच्याच

नांदेड शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढला आहे. त्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने कोरोना रूग्ण वाढत आहेत. घरात कोणी पॉझिटिव्ह आले तरी घरातील इतर सदस्य कोरोना तपासणी करण्याऐवजी मेडिकलवर जाऊन सर्दी, ताप, खोकल्यासह व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यावर भर देत आहेत. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करून घरीच उपचार करीत आहेत. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून बाधित रूग्णांचा परिसर प्रतिबंधित करणे गरजेचे आहे. अन्यथा दिवसेंदिवस हा आकडा वाढतच जाईल. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून तपासण्या केल्या तर निश्चित काही दिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होईल. परंतु, भविष्यातील धोका टळेल.

पॉझिटिव्ह रुग्ण बिनधास्त

कोरोना चाचण्या करूनही अनेकजण पॉझिटिव्ह असतानाही बिनधास्त आहेत. अनेकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले नाहीत. त्याचबरोबर पॉझिटिव्ह असूनही मला काहीच लक्षणे नाहीत, असे सांगत काही जण मॉर्निंग वाॅक, व्यायामासाठी घराबाहेर पडत आहेत. तसेच बाजारपेठेतही भाजीपाला अथवा इतर साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे आढळून येत आहे.

कोरोना तपासणी केल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्यास लगेचच विलगीकरण कक्षात घेतले जात नाही. रुग्णालयात भरती होण्यासाठी रुग्णांनाच शासकीय रुग्णालय, आयुर्वेद रुग्णालय, पंजाब भवन यासह खासगी रुग्णालयाच्या दारोदारी भटकावे लागत आहे. शासकीय रुग्णालयातून कौठा रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या रुग्णांना भरती करून घेण्याऐवजी बाहेरच उभे केले. हा प्रकार किती गंभीर आहे, हे संबंधित अधिकाऱ्याला लक्षात आले नसावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.