शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

मुदतवाढीचे आदेश पोहोचले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील ...

ठळक मुद्दे एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकºयांनी बँकेच्या रांगेत धक्के खात पीक विमा भरला होता, परंतु अद्यापही जिल्ह्यात ३ लाख ७० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती़ राज्यभरात अशीच अवस्था होती़ त्यात शासनाने पीक विमा स्वीकारण्यास ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली़ परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबतचे आदेशच मिळाले नसल्यामुळे मुदतवाढीचा आजचा पहिला दिवस वाया गेला़गतवर्षी पीक विमा योजनेसाठी खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ६७ हजार ९७३ शेतकºयांनी अर्ज केले होते़ त्यांना राज्यभरात उच्चांकी ५०२ कोटींची नुकसान भरपाईही मिळाली होती़ खरिप हंगामात या शेतकºयांनी पीक विमा कंपनीकडे ३० कोटी ४० लाखांचा हप्ता भरला होता़ त्यामुळे नुकसान भरपाईपोटी ४ लाख ४४ हजार ७४ शेतकºयांना त्याचा लाभ मिळाला होता़विशेष म्हणजे, २०१६ मध्ये खरिपाची ७ लाख ६९ हजार २५० हेक्टरवर पेरणी झाली होती़ यंदा ९८ टक्के पेरणी झाली आहे़ त्यात मृग आणि पुनवर्सू नक्षत्रानंतर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ त्यामुळे विविध राजकीय पक्ष, संघटना, शेतकºयांकडून पीक विम्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती़त्याबाबत सोमवारी शासनाने घोषणाही केली होती़ त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला होता़ परंतु मंगळवारी दिवसभर मुदतवाढी संदर्भात बँकांना आदेशच मिळाले नाहीत़बँक अधिकारीही संभ्रमात होते़ त्यामुळे जिल्ह्यातील एकाही बँकेने आज दिवसभरात शेतकºयांचा पीक विमा स्वीकारला नाही़ त्यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले असून मुदतवाढीचा पहिला दिवस वाया गेला़