शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मुदतवाढीचे आदेश पोहोचले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील ...

ठळक मुद्दे एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकºयांनी बँकेच्या रांगेत धक्के खात पीक विमा भरला होता, परंतु अद्यापही जिल्ह्यात ३ लाख ७० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती़ राज्यभरात अशीच अवस्था होती़ त्यात शासनाने पीक विमा स्वीकारण्यास ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली़ परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबतचे आदेशच मिळाले नसल्यामुळे मुदतवाढीचा आजचा पहिला दिवस वाया गेला़गतवर्षी पीक विमा योजनेसाठी खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ६७ हजार ९७३ शेतकºयांनी अर्ज केले होते़ त्यांना राज्यभरात उच्चांकी ५०२ कोटींची नुकसान भरपाईही मिळाली होती़ खरिप हंगामात या शेतकºयांनी पीक विमा कंपनीकडे ३० कोटी ४० लाखांचा हप्ता भरला होता़ त्यामुळे नुकसान भरपाईपोटी ४ लाख ४४ हजार ७४ शेतकºयांना त्याचा लाभ मिळाला होता़विशेष म्हणजे, २०१६ मध्ये खरिपाची ७ लाख ६९ हजार २५० हेक्टरवर पेरणी झाली होती़ यंदा ९८ टक्के पेरणी झाली आहे़ त्यात मृग आणि पुनवर्सू नक्षत्रानंतर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ त्यामुळे विविध राजकीय पक्ष, संघटना, शेतकºयांकडून पीक विम्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती़त्याबाबत सोमवारी शासनाने घोषणाही केली होती़ त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला होता़ परंतु मंगळवारी दिवसभर मुदतवाढी संदर्भात बँकांना आदेशच मिळाले नाहीत़बँक अधिकारीही संभ्रमात होते़ त्यामुळे जिल्ह्यातील एकाही बँकेने आज दिवसभरात शेतकºयांचा पीक विमा स्वीकारला नाही़ त्यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले असून मुदतवाढीचा पहिला दिवस वाया गेला़