शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

मुदतवाढीचे आदेश पोहोचले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील ...

ठळक मुद्दे एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकºयांनी बँकेच्या रांगेत धक्के खात पीक विमा भरला होता, परंतु अद्यापही जिल्ह्यात ३ लाख ७० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती़ राज्यभरात अशीच अवस्था होती़ त्यात शासनाने पीक विमा स्वीकारण्यास ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली़ परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबतचे आदेशच मिळाले नसल्यामुळे मुदतवाढीचा आजचा पहिला दिवस वाया गेला़गतवर्षी पीक विमा योजनेसाठी खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ६७ हजार ९७३ शेतकºयांनी अर्ज केले होते़ त्यांना राज्यभरात उच्चांकी ५०२ कोटींची नुकसान भरपाईही मिळाली होती़ खरिप हंगामात या शेतकºयांनी पीक विमा कंपनीकडे ३० कोटी ४० लाखांचा हप्ता भरला होता़ त्यामुळे नुकसान भरपाईपोटी ४ लाख ४४ हजार ७४ शेतकºयांना त्याचा लाभ मिळाला होता़विशेष म्हणजे, २०१६ मध्ये खरिपाची ७ लाख ६९ हजार २५० हेक्टरवर पेरणी झाली होती़ यंदा ९८ टक्के पेरणी झाली आहे़ त्यात मृग आणि पुनवर्सू नक्षत्रानंतर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ त्यामुळे विविध राजकीय पक्ष, संघटना, शेतकºयांकडून पीक विम्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती़त्याबाबत सोमवारी शासनाने घोषणाही केली होती़ त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला होता़ परंतु मंगळवारी दिवसभर मुदतवाढी संदर्भात बँकांना आदेशच मिळाले नाहीत़बँक अधिकारीही संभ्रमात होते़ त्यामुळे जिल्ह्यातील एकाही बँकेने आज दिवसभरात शेतकºयांचा पीक विमा स्वीकारला नाही़ त्यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले असून मुदतवाढीचा पहिला दिवस वाया गेला़