शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉट मेमध्ये ७५ हजार ८०० विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST

येत्या २३ एप्रिलपासून बारावी व २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. यापूर्वीच बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना ...

येत्या २३ एप्रिलपासून बारावी व २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. यापूर्वीच बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीटही उपलब्ध करून दिले जात आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांना एक तास आधीच केंद्रावर यावे लागणार आहे. मात्र भर उन्हात भरदुपारी पेपर सोडविताना जीवाची काहिली होणार आहे. एप्रिल, मेमध्ये जिल्ह्यात कडक उन्हाळा असतो. दुपारी तापमानाचा पारा ४३ अंशांपेक्षाही वर असतो. अनेक परीक्षा केंद्रांवर असुविधा आहेत. काही ठिकाणी पत्राच्या खोल्या असून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थाही नाही. अशा गैरसोयीच्या परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर व गुणांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पेपरची वेळ बदलण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. परीक्षेची वेळ सकाळी ८ वाजताची करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकट- ऑनलाईन अभ्यसाक्रम शिकविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे समाधान हाेऊ शकले नाही. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्णपणे समजला नाही. त्यातच आता कोरोनाचे संकट भयंकर असताना एप्रिल व मे महिन्यातच परीक्षा घेण्यात येत आहेत. कोरोनाची दहशत व उन्हाचा सामना करत विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा घेतली जात आहे. एकतर परीक्षा पुढे ढकलाव्यात किंवा परीक्षेची वेळ सकाळी ८ वाजता करावी. - शिवराज इंगळे, विद्यार्थी

चौकट- विद्यार्थ्यांना वर्षभर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दहावी, बारावीचे वर्ष असतानाही त्यांना अभ्यासक्रम पूर्णपणे शिकविण्यात आला नाही. आता अभ्यास न होताच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. - अशोक जाधव, पालक