शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हॉट मेमध्ये ७५ हजार ८०० विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST

येत्या २३ एप्रिलपासून बारावी व २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. यापूर्वीच बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना ...

येत्या २३ एप्रिलपासून बारावी व २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. यापूर्वीच बोर्डाने वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीटही उपलब्ध करून दिले जात आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांना एक तास आधीच केंद्रावर यावे लागणार आहे. मात्र भर उन्हात भरदुपारी पेपर सोडविताना जीवाची काहिली होणार आहे. एप्रिल, मेमध्ये जिल्ह्यात कडक उन्हाळा असतो. दुपारी तापमानाचा पारा ४३ अंशांपेक्षाही वर असतो. अनेक परीक्षा केंद्रांवर असुविधा आहेत. काही ठिकाणी पत्राच्या खोल्या असून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थाही नाही. अशा गैरसोयीच्या परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर व गुणांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पेपरची वेळ बदलण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. परीक्षेची वेळ सकाळी ८ वाजताची करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकट- ऑनलाईन अभ्यसाक्रम शिकविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे समाधान हाेऊ शकले नाही. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्णपणे समजला नाही. त्यातच आता कोरोनाचे संकट भयंकर असताना एप्रिल व मे महिन्यातच परीक्षा घेण्यात येत आहेत. कोरोनाची दहशत व उन्हाचा सामना करत विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा घेतली जात आहे. एकतर परीक्षा पुढे ढकलाव्यात किंवा परीक्षेची वेळ सकाळी ८ वाजता करावी. - शिवराज इंगळे, विद्यार्थी

चौकट- विद्यार्थ्यांना वर्षभर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दहावी, बारावीचे वर्ष असतानाही त्यांना अभ्यासक्रम पूर्णपणे शिकविण्यात आला नाही. आता अभ्यास न होताच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. - अशोक जाधव, पालक