शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

मे महिन्यात मराठवाड्यातील रुग्णसंख्या दीड लाखापुढे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST

नांदेड : मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या दिवसात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती असून, २ मेपर्यंत मराठवाड्यातील ...

नांदेड : मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या दिवसात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती असून, २ मेपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ५८ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता आरोग्य विभागानेच वर्तविली आहे. रुग्णवाढीमुळे आयसोलेशन, ऑक्सिजन आणि आयसीयू खाटासह व्हेंटीलेटर्स कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्र अनुभवत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, मृत्यूदरही वाढलेला आहे. आरोग्य विभागाने ज्या पाच जिल्ह्यांच्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेडचा मृत्यूदर मागील आठवड्यात १.८२ टक्केवर गेला होता. साप्ताहिक पॉजिटीव्हीटीमध्येही उस्मानाबादसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. उस्मानाबादचा सर्वाधिक ३९.२५ टक्के पॉजिटीव्हीटी रेट होता. तर परभणी ३६.७८ आणि हिंगोलीचा रेट ३६.७० असा आढळला आहे. या तीनही जिल्ह्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच येणाऱ्या दिवसात मराठवाड्यातील सक्रिय रुग्ण संख्या सध्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून २ मेपर्यंत हा आकडा १ लाख ५८ हजाराच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसे झाल्यास आयसोलेशन ऑक्सिजन, आयसीयूसह व्हेंटीलेटर्सचीही मोठ्या प्रमाणात कमतरता पडू शकते. आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार रुग्णवाढ झाल्यास मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात १७ हजार ७०० आयसोलेशन खाटा कमी पडतील. तर ८ हजार ६३० ऑक्सिजन खाटासह ११४५ आणखी आयसीयू खाटांची गरज भासू शकते. याबरोबरच २०९ व्हेटीलेटर्स आणखी उपलब्ध करावे लागणार आहेत. आरोग्य विभागाने वर्तविलेला हा अंदाज पाहता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आणखी आरोग्य सुविधा वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

चौकट.............

रुग्णवाढीचा असा आहे अंदाज...

राज्याच्या आराेग्य विभागाने मराठवाड्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ मेपर्यंत सुमारे १ लाख ५८ हजारांच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तविला आहे. २ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ३० हजार ७३१ असण्याची शक्यता आहे. तर जालना १५ हजार ९५६, बीड १९ हजार ५३६, लातूर ३६ हजार ८९८, परभणी २२ हजार ६३९, हिंगोली ४ हजार ४१९, नांदेड २८ हजार ४० तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ मेपर्यंत १० हजार २७७ पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

सध्याच ऑक्सिजनसह आयसोलेशन खाटा फुल्ल...

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण आयसोलेशन खाटांच्या १७९.३६ टक्के वापर होत आहे. परभणी १४४.९२, हिंगोली ७९.५०, औरंगाबाद ७३.०४, बीड ४६.६७, उस्मानाबाद ४६.२२, लातूर ४४.९३ तर जालना जिल्ह्यातील २७.२८ टक्के आयसोलेशन खाटा भरलेल्या आहेत. हिंगोलीत एकूण खाटांच्या तुलनेत १२६.६७ टक्के व्हेंटीलेटर्स वापरले जात आहेत. तर औरंगाबाद १०४.५७, लातूर ७४.७७, जालना ६०.१६, उस्मानाबाद ४७.६६, बीड १७.३३ तर नांदेड जिल्ह्यात एकूण खाटांच्या तुलनेत १५.३८ टक्के व्हेंटीलेटर्सचा वापर करण्यात येत आहे.