शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गोदावरी शुद्धीकरणासाठी तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:14 IST

नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत मिळणा-या नाल्यांचे घाण आणि नदीतील जलपर्णी काढून नदीपात्राचे शुद्धीकरण करण्यासाठी महापालिका आता तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे़

नांदेड : नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत मिळणा-या नाल्यांचे घाण आणि नदीतील जलपर्णी काढून नदीपात्राचे शुद्धीकरण करण्यासाठी महापालिका आता तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे़ त्यासाठी शुक्रवारी मनपात प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांच्या उपस्थितीत शहरातील तज्ज्ञ मंडळीची बैठक घेण्यात आली़गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे़ गोदावरीत शहरातील सांडपाण्याचे १९ नाले थेट सोडण्यात येतात़ त्याचबरोबर नदीपात्रात वाढणारी जलपर्णीही मनपासाठी डोकेदुखी ठरत आहे़ त्यामुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे़ गेल्या दहा दिवसांपासून महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे़ गोदावरीतील जलपर्णी काढण्याचे कामही वेगाने सुरु आहे़ त्यासाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय नेतेही पुढे आले आहेत़ दरम्यान, गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी महापालिकेने शहरातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणार आहे़ त्यासाठी शुक्रवारी प्रभारी आयुक्त काकडे यांनी शहरातील तज्ज्ञ मंडळींची बैठक घेतली़या बैठकीत गोदावरी पात्रात वाहणा-या नाल्याचे पाणी शुद्धीकरण करुन आवश्यक त्या ठिकाणी पुनर्वापर करणे व नव्याने अतिरिक्त मलवाहिनी टाकून दूषित पाणी गोदावरीत जाणार नाही़ तसेच नदीपात्रात वाढत असलेल्या जलपर्णींची वाढ थांबविणे़ तसेच समूळपणे नायनाट करता येईल का? याबाबत नागरिकांचा सल्ला घेण्यात आला़या बैठकीला डॉ़ व्यंकटेश काब्दे, आऱयु़पाटील, प्राचार्य डॉ़बी़यूग़वई, राघवेंद्र कट्टी, पर्यावरणतज्ज्ञ प्रा़बी़एस़सुरवसे, प्रा़ प्रकाश जाधव, हर्षद शहा, द़मा़रेड्डी, सुरेश जोंधळे, अभिजित पाटील, बिरबल यादव, संदीप छारवाल, महेंद्र देशपांडे, सौरभ साले, संधू, कलीम परवेज यांची उपस्थिती होती़

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरी