शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

कंधारात राष्ट्रीयीकृत बँकेत शाखा व्यवस्थापकाअभावी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:22 IST

शहरातील एसबीआय बँक नोकरदार, व्यापारी, शेतकरी, लहान उद्योजक आदींसाठी उपयुक्त म्हणून ओळखली जाते. बँकेत कर्मचाऱ्यांची चांगली संख्या होती. ...

शहरातील एसबीआय बँक नोकरदार, व्यापारी, शेतकरी, लहान उद्योजक आदींसाठी उपयुक्त म्हणून ओळखली जाते. बँकेत कर्मचाऱ्यांची चांगली संख्या होती. त्यामुळे पीक कर्ज, गृह, चार चाकी वाहन, व्यापार, पगारावर, वैयक्तिक आदींसाठी कर्जाचा पुरवठा केला जात होता; परंतु कुठे काय झाले समजत नाही, करन्सी चेस्ट बँक सुविधा राहिली नाही. आज घडीला बँकेची अवस्था नाजूक अशी झाली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यातच बँकेला शाखा व्यवस्थापक पद गत तीन महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे कर्ज पुरवठा करणे ठप्प झाले आहे. शहरात नवीन शाखा मंजूर होऊन सव्वा वर्ष लोटले. तरीही अद्याप मुहूर्त लागला नाही. ही शाखा कर्ज पुरवठा होण्यासाठी सोयिस्कर होईल, अशी आशा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे नोकरदार, व्यापाऱ्यांना नवीन शाखा कार्यान्वित होण्याची मोठी आस लागली आहे; परंतु परवानगी, आरबीआयचा कोड उपलब्ध होऊनही नवीन शाखेला मुहूर्त का लागत नाही, हे ग्राहक व नागरिकांना न उलगडणारे कोडे ठरत आहे.

नाव मोठं लक्षणं खोटं

एसबीआय ही सर्वांत मोठी बँक असून २५ पेक्षा अधिक गावे, वाड्या, तांडे येथील ५० हजारांपेक्षा अधिक खातेदारांचा सतत आर्थिक व्यवहार होतो. आज घडीला मात्र रकमा जमा करणे व उचलणे हे काम होत आहे; परंतु विविध कर्जांसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे. कर्ज मंजुरीसाठी उदगीर, जि. लातूर येथील बँक कार्यालयावर अवलंबून राहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. बँक विविध कर्ज पुरवठा करून मिळणाऱ्या व्याजातून आपली आर्थिक सक्षमता वाढवते; परंतु तसे घडत नसल्याने बँकसुद्धा आर्थिक अडचणीत येण्याचा धोका वाढला आहे.

पीक कर्ज मंजुरीचे प्रस्ताव उदगीरला

ओल्या दुष्काळामुळे गतवर्षी खरीप हंगामाला मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले. यंदा खरिपासाठी कर्जाचे प्रस्ताव शेतकऱ्यांनी दाखल केले; परंतु मंजुरीसाठी उदगीरला पाठविले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळणे कठीण झाले आहे.

पुढाऱ्यांचे साफ दुर्लक्ष

लहान सहान कार्यक्रमात पुढारी, लोकप्रतिनिधी सतत विकासावर बोलत असतात. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी निर्माण झालेल्या अडचणी पुढाऱ्यांच्या कानी कशा पडत नाहीत, असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे. घटना, घडामोडी घडतात तेव्हा गाजावाजा करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पुढारी, कार्यकर्ते आदींना शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या अडचणी कधी समजणार आहेत? असा सवाल केला जात आहे.