शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कंधारात राष्ट्रीयीकृत बँकेत शाखा व्यवस्थापकाअभावी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:22 IST

शहरातील एसबीआय बँक नोकरदार, व्यापारी, शेतकरी, लहान उद्योजक आदींसाठी उपयुक्त म्हणून ओळखली जाते. बँकेत कर्मचाऱ्यांची चांगली संख्या होती. ...

शहरातील एसबीआय बँक नोकरदार, व्यापारी, शेतकरी, लहान उद्योजक आदींसाठी उपयुक्त म्हणून ओळखली जाते. बँकेत कर्मचाऱ्यांची चांगली संख्या होती. त्यामुळे पीक कर्ज, गृह, चार चाकी वाहन, व्यापार, पगारावर, वैयक्तिक आदींसाठी कर्जाचा पुरवठा केला जात होता; परंतु कुठे काय झाले समजत नाही, करन्सी चेस्ट बँक सुविधा राहिली नाही. आज घडीला बँकेची अवस्था नाजूक अशी झाली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यातच बँकेला शाखा व्यवस्थापक पद गत तीन महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे कर्ज पुरवठा करणे ठप्प झाले आहे. शहरात नवीन शाखा मंजूर होऊन सव्वा वर्ष लोटले. तरीही अद्याप मुहूर्त लागला नाही. ही शाखा कर्ज पुरवठा होण्यासाठी सोयिस्कर होईल, अशी आशा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे नोकरदार, व्यापाऱ्यांना नवीन शाखा कार्यान्वित होण्याची मोठी आस लागली आहे; परंतु परवानगी, आरबीआयचा कोड उपलब्ध होऊनही नवीन शाखेला मुहूर्त का लागत नाही, हे ग्राहक व नागरिकांना न उलगडणारे कोडे ठरत आहे.

नाव मोठं लक्षणं खोटं

एसबीआय ही सर्वांत मोठी बँक असून २५ पेक्षा अधिक गावे, वाड्या, तांडे येथील ५० हजारांपेक्षा अधिक खातेदारांचा सतत आर्थिक व्यवहार होतो. आज घडीला मात्र रकमा जमा करणे व उचलणे हे काम होत आहे; परंतु विविध कर्जांसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे. कर्ज मंजुरीसाठी उदगीर, जि. लातूर येथील बँक कार्यालयावर अवलंबून राहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. बँक विविध कर्ज पुरवठा करून मिळणाऱ्या व्याजातून आपली आर्थिक सक्षमता वाढवते; परंतु तसे घडत नसल्याने बँकसुद्धा आर्थिक अडचणीत येण्याचा धोका वाढला आहे.

पीक कर्ज मंजुरीचे प्रस्ताव उदगीरला

ओल्या दुष्काळामुळे गतवर्षी खरीप हंगामाला मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले. यंदा खरिपासाठी कर्जाचे प्रस्ताव शेतकऱ्यांनी दाखल केले; परंतु मंजुरीसाठी उदगीरला पाठविले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळणे कठीण झाले आहे.

पुढाऱ्यांचे साफ दुर्लक्ष

लहान सहान कार्यक्रमात पुढारी, लोकप्रतिनिधी सतत विकासावर बोलत असतात. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी निर्माण झालेल्या अडचणी पुढाऱ्यांच्या कानी कशा पडत नाहीत, असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे. घटना, घडामोडी घडतात तेव्हा गाजावाजा करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पुढारी, कार्यकर्ते आदींना शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या अडचणी कधी समजणार आहेत? असा सवाल केला जात आहे.