शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

७४ वर्षातही आदिवासी वस्तीला पक्का रस्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

तालुक्यातील अंबाडी तांडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वरगुडा या आदिवासी वस्तीला आजही पक्का रस्ता नाही. २०१५-१६ मध्ये अंबाडी तांडा बसस्थानक ...

तालुक्यातील अंबाडी तांडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वरगुडा या आदिवासी वस्तीला आजही पक्का रस्ता नाही. २०१५-१६ मध्ये अंबाडी तांडा बसस्थानक ते वरगुडा घाटाच्या अलीकडील रस्ता झाला आहे. मात्र घाटातील दीड किलोमीटर अंतराचा रस्ता जंगल क्षेत्रामुळे झालाच नाही. त्यामुळे या वस्तीतील जनतेला अजूनही तीन ते चार किलोमीटर पायपीट अंबाडी तांडा बसथांब्यावर येऊन नंतर एखाद्या वाहनाने किनवट असो किंवा अन्य ठिकाणी जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी वन्य श्वापदांचा सामना करत ये-जा करण्याची वेळ आजही वरगुडा येथील जनतेवर आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न कायम आहे. गांव तिथे रस्ता बारामाही रस्ते डांबरीकरणाने जोडणार हा उपक्रम राबविण्यात आला. पण वरगुड्याच्या रस्त्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने ‘जिथे विकासाची बात तिथे आदिवासीपासून सुरुवात’ हे घोषवाक्य जाहीर केले होते. पण वरगुडा येथील आदिवासी अजूनही उपेक्षितच आहे.

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने किनवट या आदिवासी तालुक्यातील वन रस्ता असलेल्या वरगुडा या आदिवासी वस्तीचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.

शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व त्यांच्या टीमने प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम राबविला. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, वनविभागाचे उपवनसंरक्षक व इतर जिल्हास्थित अधिकाऱ्यांनी वरगुडा या आदिवासी वस्तीला भेट देऊन तेथील आदिवासींची समस्या जाणून घ्यावी अशी मागणी वरगुडा येथील आदिवासी करीत आहेत. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षातही पक्का रस्ता नसल्याने जंगल भागात असलेले आदिवासी पक्क्या रस्त्याच्या आजही प्रतीक्षेत आहेत हे विशेष.